चालू घडामोडीवर कोणते प्रश्न विचारले जातात ?
स्पर्धा परीक्षा मध्ये सर्वात कठीण असणारे प्रश्न म्हणजे चालू घडामोडीचे परंतु याचा अभ्यास काही मुद्द्याला धरून अभ्यास केल्यास चांगले गुण मिळतात .चालू घडामोडींचे प्रश्न कश्या पध्दतीने विचारले जातात .ते खालील मुद्याप्रमाणे सांगता येतील .
1) महाराष्ट्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर रोज लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, व कोणताही एक इंग्रजी वर्तमानपत्र असे तीन वर्तमानपत्र वाचावे .व जे महत्त्वाचे असेल त्यांची नोट्स काढून घ्यावी.
2) नोट्स काढताना राजकिय ,सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा असे वेगवेगळ्या विभागणी करून नोट्स काढावेत .
3)सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर एखादी माहिती जसे उदा. धूमकेतू विषयी असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे कारण त्याविषयी परीक्षेत विचारले जातात.
4)कोणतेही एक मासिक वाचावे.व सकाळ चे एअर बुक येतात ते वाचावे.
5) पुरस्कार चा अभ्यास करताना केवळ राष्ट्रीय राज्य पातळीवर चे तसे विशेष पुरस्कार यांचाच अभ्यास करावा.स्थानिक पातळीवरचे पुरस्कारांचा अभ्यास करू नये.
6)चालू घडामोडींचा व इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र, सायन्स या विषयांचा परस्पर संबंध असतो. चालू घडामोडी मधे जर एखादी बातमी धुमकेतू ची असेल तर त्याचा इतिहास, त्याचा सायन्स परीक्षेत येतात .थोडक्यात जर एखादी न्यूज संबंधित विषयावर असतील तर त्याचा पुर्ण अभ्यास करणे खूप महत्त्वाचे असते .
Comments
Post a Comment