Skip to main content

Posts

Showing posts with the label योजना

कोरोनाच्या साथीमध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकास 50 हजार मिळणार .

कोरोनाच्या साथीमध्ये मृत्यू झालेल्या नातेवाईकास 50 हजार मिळणार . कोरोनाच्या महामारी मध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहेत .यामध्ये महाराष्ट्र राज्यात कोरोनाच्या आजारामुळे सुमारे 40 हजार नागरिकांचा मृत्यू झालेला आहे . या मृत्यू झालेल्या नातेवाईकास 50 हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार आहेत .यामध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तीचे कोरोनामुळे मृत्यू झाला असणे आवश्यक आहे .शिवाय त्या व्यक्तीचे कोरोना चाचणी पॉझिटिव्ह असणे आवश्यक .    त्या रुग्णाचा मृत्यू कोरोना रोगाचा उपचार घेताना किंवा उपचार घेऊन घरी 30 दिवसाच्या आत मृत्यू झाला आहे त्याचबरोबर कोरोनाच्या आजारामुळे त्रासून आत्महत्या केलेल्या व्यक्तीच्या नातेवाईकास सानुग्रह अनुदान मिळण्यास पात्र असतील . यासाठी अर्जदाराचा आधार नंबर, बँक पासबुक, इतर नातेवाईकांचा ना हरकत दाखला ,कोविड -19 मुळे मृत्यू पावल्याचे मृत्यू दाखला .हे कागदपत्रे आवश्यक असतील . शासन निर्णय डाउनलोड करा . शासन निर्णय

शेतकरी जनता अपघात विमा योजना.

 शेतकरी जनता अपघात विमा योजना.    उद्देश - शेती व्यवसाय करत  असताना होणारे अपघात वीज पडणे, सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शौक , त्याचबरोबर इतर नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या नुकसानाची आर्थिक सहाय्य. पात्रता - 1. महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी 2. शेती व्यवसाय करत असावा 3. 10 ते 75 वयोगट व्यक्ती 4. शेतकरी म्हणून 7 / 12 वर नोंद वैशिष्ट्ये-  शासनाकडून सर्व शेतकऱ्यांची खाते धारकांचा विमा हफ्ता भरला जातो वैयक्तिकरित्या विमा हप्ता भरण्याची आवश्यकता नाही.  मिळणारे लाभ-  1)अपघातामध्ये दोन्ही डोळे / दोन अवयव  निकामी झाल्यास- 100,000 रुपये. 2)एक डोळा/एक अवयव निकामी झाल्यास- 50,000 रुपये. 3)एक डोळा व एक अवयव निकामी झाल्यास -100,00 रुपये 4)अपघाती मृत्यू - 100,000

जिल्हा परिषदेच्या " शेळी वाटप योजना "चे नवे नियम /अटी व शर्ते .

 जिल्हा परिषदेच्या " शेळी वाटप योजना "चे नवे नियम /अटी व शर्ते .   जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत गरजूंना किंवा जे शेळी पालन व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी शेळी वाटप योजना आहे .ही योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते .या योजनेची अटी शर्ते खालीलप्रमाणे आहेत . ज्या प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे असा प्रवर्ग -  लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध असावा . या योजनेची प्रमुख अटी - 1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)वरील प्रमाणे नमूद केल्याप्रमाणे लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध असावा . 3)दि 01 /05 /2001 नंतर दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये नसावेत. 4)लाभार्थी मध्ये 33% महिला लाभार्थी असावेत . शेळी गट वाटप /अर्थिक सहाय्य-    या योजनेनुसार लाभार्थीस एक शेळी गट ज्यामध्ये 10 शेळी व एक बोकड असा शेळीचा गट मिळतो .यामध्ये 75%अनुदान तर 25%वित्तीय /बँकिंग संस्थाचे कर्ज स्वरुपात लाभ मिळतो .प्रति बोकड 7000 /- व शेळी प्रति शेळी 6000/- याप्रमाणे 10 शेळीचे 60000 व बोकडचे 7000 असे ऐकून 67000 /- प्रति लाभार्थीला मिळेल यामधून शेळीचा विमा 2.25...

"माझी कन्या भाग्यश्री योजना " च्या नवीन नियम व शर्ते वाचा सविस्तर.

 "माझी कन्या भाग्यश्री योजना " च्या नवीन नियम व शर्ते वाचा सविस्तर.  " माझी कन्या भाग्यश्री " ही योजना महाराष्ट्र सरकारच्या विकास विभागामार्फत राबविण्यात येते .या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सबलीकरण असून समाजामध्ये स्त्री -पुरुष लिंग गुणोत्तर समान करणे .ही योजना नवीन अटी व शर्ते नुसार लागू करण्यात आली आहे .ही योजना मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या माता पित्यास आर्थिक स्वरूपात सहाय्य केले जाते. 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्माला येणाऱ्या मुली या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील . पहिल्या मुलीच्या जन्मानंतर माता पित्याने कुटूंबनियोजन साठी शस्त्रक्रिया केली असल्यास ₹50000/- माता पित्यास आर्थिक सहाय्य केले जाते. पहिली मुलीच्या जन्मानंतर दुसरीही मुलगी जन्माला आली असेल आणि त्यानंतर माता पित्याने कुटूंबनियोजन साठी शस्त्रक्रिया केली असल्यास ₹25000/- माता पित्यास आर्थिक सहाय्य केले जाते. पहिली मुलगी जन्माला आली असेल व त्यानंतर दुसऱ्यांदा जुळ्या मुली जन्माला आली असतील तर असे माता पिता या योजनेसाठी पात्र असतील . पहिल्या मुलीच्या जन्मानंतर 2 वर्षाच्या आत कुटूंबनियोजन शस्त्र...

नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना अंतर्गत ₹ 6000/-अनुदान.

 नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना अंतर्गत ₹6000/-अनुदान.   नरेंद्र मोदी शेतकरी साठी एक योजना चालू केली असून या योजनेचे गरीब /अल्पभूधारक शेतकरी याचा लाभ घेत आहेत .अजून बरेच  काही गरीब शेतकरी /अल्पभूधारक शेतकरी याचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत. या योजनेची सविस्तर माहिती खालील तपशीलप्रमाणे आहे. या योजनेची प्रमुख अटी व शर्ते - 1) लाभार्थी हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीच्या नावावर 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेत जमीन नावावर असणे आवश्यक आहे. ही या योजनेची प्रमुख अट आहे. 3)लाभार्थी हा शासकीय कर्मचारी असू नये. लागणारे आवश्यक कागतपत्रे - 1)आधारकार्ड /मतदानकार्ड 2)जमीन सातबारा /अल्पभूधारक प्रमाणपत्र 3)बँक पासबुक  अधिक माहितीसाठी संपर्क - आपल्या महसूल तलाठीशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता व तेथेच या योजनेचा अर्ज उपलब्ध होईल.

असंघटित कर्मचारी /कामगार /शेतकरी साठी अत्यल्प प्रीमियम वरील अटल पेन्शन योजना.

 असंघटित कर्मचारी /कामगार /शेतकरी साठी अत्यल्प प्रीमियम वरील अटल पेन्शन योजना. योजनेचे नाव - अटल पेन्शन योजना . ही योजना केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येते . प्रमुख अटी व शर्ते - 1) लाभार्थी हा भारताचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)वयाचे कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्ष असणे आवश्यक आहे. 3)लाभार्थी हा असंघटित कर्मचारी ,खाजगी कर्मचारी, शेतकरी, रोजगार करणारे मजूर या योजनेसाठी पात्र ठरतील . या योजनेचे फायदे -  1)अत्यल्प प्रीमियम ची सुविधा . 2)यामध्ये केंद्र सरकार 50 % रक्कम लगेच प्रिमियम मध्ये जमा करते . 3)प्रीमियम महिन्याला ,तिमाही ,अर्धवर्षी प्रीमियम भरता येतो. 4)वयाच्या 60 व्या वर्षीपासून लगेच पेन्शन चालू होईल . 5)ज्यांना एकदाच भरलेली रक्कम हवी असेल त्यांना व्याजासकट केंद्र सरकारतर्फे जमा झालेली 50 %रक्कम वयाच्या 60 व्या वर्षी मिळेल. आवश्यक कागतपत्रे - 1)आधारकार्ड /मतदानकार्ड 2)रहिवासी पुरावा 3)कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचे प्रिमियम केवळ 126 ते 864 रुपयांपर्यंत आहे .वयाच्या 60 व्या वर्षी किमान आपल्या प्रिमियम नुसार 1000 ते 5000 रुपये मासिक प...

लॉकडाउन मध्ये घरीच राहून कमावण्याच्या संधी .

  लॉकडाउन मध्ये घरीच राहून कमावण्याच्या संधी स्रोत .      महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहेत.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे अनेकजनाना जॉब वरून कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे घरीच राहून कमाई करण्याचे संधी शोधली पाहिजे .व ही संधी कायमस्वरूपी कमाई करून देणारी आहेत त्या संधी स्रोत खालीलप्रमाणे सांगता येतील. 1)आपला स्वतःचा व्यवसाय असल्यास ,त्याची ऑनलाइन पद्धतीने विक्री करणे .         अमेझॉन ,फ्लिपकार्ट ,खाद्य पदार्थांसाठी झोमॅटो सारखे ऑनलाइन apps आहेत .या apps च्या माध्यमातून आपण आपल्या वस्तू /पदार्थ ऑनलाइन पद्धतीने विक्री करू शकतो. व या माध्यमातून चांगली कमाई करू शकतो ,ज्यांचा अगोदर व्यवसाय होता असे व नव्यानेही सुरू करु शकतात. 2)ऑनलाइन माध्यम - युट्युब          ऑनलाइन माध्यम युट्युब सध्या खूप लोकप्रिय झालेला आहे. या माध्यमातून अनेक जण ऑनलाइन पैसे कमावतात .यामध्ये आपला युट्युब चॅनेल तयार करून आपल्या कडील असणाऱ्या कला ,कौशल्य यांच्यावर आधारित विडिओ तयार करून युट्युब वर अपलोड...

महिला बचत गट योजना व फायदे.

              महिला बचत गट योजना व फायदे.             महिला बचत गटास स्वयंसहाय्यता असेही म्हणतात .यामध्ये केवळ महिला सदस्य एकत्र येतात व गट स्थापन करतात .याचा मुख्य उद्देश म्हणजे एकमेकांना आर्थिक सहाय्यपूर्ण करणे हा असतो. यामध्ये 20 व त्यापेक्षा कमी महिला एकत्र येतात व काही विशिष्ट रक्कम जमा महिन्यातून एकदा किंवा आढवड्यातून एकदा जमा करतात .व जमा झालेली रक्कम ही गटामधीलच सदस्यांनी विशिष्ट व्याजदराने कर्जाने रक्कम दिली जाते. महिला बचत गटाचे वैशिष्ट्ये - 1) यामध्ये केवळ महिला सदस्याचे गट असते. 2)18 वयोवर्ष पूर्ण झालेल्या कोणतीही महिला सदस्य या गटाचे सदस्य होऊ शकतात. 3)महिला बचत गटाचा मुख्य उद्देश हा आर्थिक सहाय्य करणे हा असतो. 4)महिन्यातुन किंवा आढवड्यातून एकदा बचत गटातील सदस्य एकत्र जमा होऊन विशिष्ट रक्कम जमा करतात. 5)जमा झालेली रक्कम ज्या सदस्याला आवश्यक आहे ,त्यांना विशिष्ट व्याजदराने दिली जाते. बचत गटाचे शासकीय व वित्तीय फायदे - 1) विविध बँकेमार्फत महिला बचत गटांना अत्यल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात. 2)शासनाच्या वि...

महाराष्ट्र राज्य सरकारची केवळ 2% व्याजदराने,25% बीजभांडवल व 25000/-थेट कर्ज योजनाच्या नवे अटी शर्ती नियम.

 महाराष्ट्र राज्य सरकारची केवळ 2% व्याजदराने, 25% बीजभांडवल व 25000/-थेट कर्ज योजनाच्या नवे अटी शर्ती नियम.   महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे व्यवसाय करणाऱ्या नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना आहे. ही एक कर्ज योजना असून या योजनेच्या कर्जाचे व्याजदर अत्यल्प आहे. व परतफेडीची मदतही जास्त आहे. योजनेचे नाव- राज्य सरकार 25%बीजभांडवल किंवा 25000/-थेट कर्ज योजना . योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्या प्रवर्गाचे नाव -  1)विमुक्त जाती (व्ही. जे) 2)भटक्या जमाती (भ. ज) 3)विशेष मागास प्रवर्ग (ओ. बी.सी) योजनेसाठी प्रमुख अटी व शर्ते- 1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे किंवा 20 वर्षे कायम महाराष्ट्र राज्यात रहिवास असणे आवश्यक आहे. 2)लाभार्थीच्या वय किमान 18 व कमाल वय 45 असणे आवश्यक आहे. 3)लाभार्थी हा वरील नमूद केलेल्या प्रवर्गातिल असणे आवश्यक आहे. 5)इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज बाकी असू नये. 6)व लाभ घेणाऱ्याचे वार्षिक उत्त्पन्न -1 लाख पर्यंत असावे. लाभाचे आर्थिक स्वरूप -  25% बीजभांडवल साठी व्यावसायाची प्रकल्प मर्यादा 5 लाखासाठी 4% व्याजदराने 5 वर्ष परतफे...

सुशिक्षित बेरोजगार साठी उदयोग करण्यासाठी मुद्रा कर्ज योजना .

 सुशिक्षित बेरोजगार साठी उदयोग करण्यासाठी मुद्रा कर्ज योजना .   मा. नरेंद्र मोदी यांनी दि.8 एप्रिल 2015 रोजी बेरोजगार सुशिक्षित युवकांसाठी उद्योग उभारण्यासाठी या कर्ज योजनेची सुरुवात केली.या कर्ज योजनेची तीन गटात वर्गीकरण करण्यात आले आहेत.   1)शिशु गट - 10000/-ते 50000/-   2)किशोर गट -50000/- ते 5 लक्ष  3)तरुण गट - 5 लक्ष ते 10 लक्ष        ही योजना सुशिक्षित बेरोजगार तरुण यासाठी असून किरकोळ भाजीपाला विक्रेता, गवंडी ,लहान उद्योग ,सुतार उद्योग ,बेकरी विक्रेता ,शिंपी हे उद्योग शिशु गटात मोडतात .ह्या योजनेचा लाभ घेणारे तरुण गरीब होतकरु मागासवर्गीय असणे किंवा आर्थिक दृष्टीने मागास असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार कर्जाची रक्कम मिळेल. वरी नमूद केल्याप्रमाणे कर्जाची रक्कम मिळेल. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम आपण आपल्या जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेला भेट देणे गरजेचे आहे .त्याठिकाणी आपल्याला मुद्रा लोन योजनेचा अर्ज प्राप्त होईल. त्याठिकाणी योजनेची सर्व माहिती प्राप्त होईल . प्रमुख अटी व शर्ते - 1)लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचा रहिवा...

राज्य शासनाची वाहनचालक मोफत प्रशिक्षण योजना अटी व शर्ते.

 राज्य शासनाची वाहनचालक मोफत प्रशिक्षण योजना अटी व शर्ते.     महाराष्ट्र शासनातर्फे वाहनचालक प्रशिक्षण योजना राबविण्यात येते यासाठी खाजगी प्रशिक्षण संस्था कडून वाहनचालक प्रशिक्षण घेणाऱ्याना प्रशिक्षण अनुदान दिले जाते. पात्र लाभार्थी - लाभार्थी विशेष मागासवर्गीय ,विमुक्त जाती/जमाती,इतर मागास प्रवर्ग ,अनुसूचित जाती या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता -10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण अनुदान दर हे प्रशिक्षण वाहन प्रकारानुसार दिले जाते. हलके वाहन प्रशिक्षण= 4264/- जड वाहन प्रशिक्षण   = 4960 /- वाहक                      =1728/-   जर लाभार्थी प्रशिक्षण काळात वसतिगृह राहत नसल्यास प्रति महा 300 रुपये विद्यावेतन दिले जाते.व वाहक प्रशिक्षण करणाऱ्यास 150 रुपये विद्यावेतन दिले जाते. लागणारे कागदपत्रे   1)आधारकार्ड /मतदान कार्ड. 2)महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र. 3)10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र. 4)शासनमान्य वाहन प्रशिक्षण संस्था प्रवेश पावती. 5)योजना पात्र असणाऱ्या जातीचा दाखला. अर्ज कर...

श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना नवीन अटी शर्ती.

 श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजना नवीन अटी शर्ती.  योजनेचे नाव - श्रावणबाळ राज्य निवृत्तीवेतन योजना असे आहे. केंद्र /राज्य वाटा - 33%म्हणजे 200 रुपये केंद्र सरकार द्वारे तर 66%म्हणजे 400 रुपये राज्य सरकार अनुदान असे एकूण 600 /-मासिक निवृत्तीवेतन पात्र लाभार्थ्यांना मिळते. योजना लाभार्थी साठी आवश्यक अटी व शर्ती /पात्रता- 1)लाभार्थी महाराष्ट्र राज्याचा कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)लाभार्थीचे वय 65 वर्ष व त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. 3)लाभार्थीचे वार्षिक उत्पन्न 21000 /- किंवा त्यापेक्षा जास्त असू नये किंवा लाभार्थी दारिद्र्यरेषेखालील असणे आवश्यक आहे. आवश्यक कागदपत्रे - 1) आधारकार्ड  2)रेशनकार्ड 3)राष्ट्रीयीकृत बँकेचे बँक पासबुक 4)वयाचा सरकारी वैद्यकीय अधिकारी यांचा दाखला 5)तलाठी ,ग्रामसेवक ,सरपंच यांचा दाखला संपर्क - संबंधित तलाठी कार्यालय .     या योजनेचा लाभ राज्य शासनाकडून देण्यात येत असून केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना तर्फे 200 रुपये तर राज्य सरकार तर्फे 400 रुपये अनुदान मिळते .

"ग्रामपंचायत" सरकारी योजना कोणत्या ?

" ग्रामपंचायत " सरकारी योजना कोणत्या ?       ग्रामपंचायत गाव पातळीवर सरकारी योजना राबविण्याचे काम ग्रामपंचायत मार्फत केले जाते.यासाठी प्रत्येक वर्षी या विकास कामासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी दिला जातो .हे कामकाज ग्रामपंचायत मध्ये सरपंच योजना कोणत्या राबवायच्या निधी कसा खर्च करायचा याकडे सरपंच लक्ष देत असतो .ग्रामपंचायत पातळीवर सरकारी कामकाज पाहण्यासाठी ग्रामसेवक या अधिकारी ची नेमणूक केलेली असते .असे कोणकोणत्या सरकारी योजना आहेत .जे ग्रामपंचायत पातळीवर राबविण्यात येतात. ते खालीलप्रमाणे आहेत. 1) समशान भूमी योजना -       गाव पातळीवर समशान भूमी साठी राज्य शासनामार्फत विशेष योजना करण्यासाठी आली असून यासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी खर्च करण्यात येतो. 2)शौचालय निधी खर्च योजना-     वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी केंद्र सरकार मार्फत 75% निधी म्हणजे 9000/- रुपये व राज्य सरकार मार्फत 25% म्हणजे 3000/- रुपये दिले जाते .या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये  ग्रामसेवकला संपर्क करावा . 3)घरकुल योजना -     ही योजना वेगवेगळ्या नावाने ...

महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना

  महाराष्ट्र राज्य व केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती योजना महाराष्ट्र राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत ही योजना राबविण्यात येत असून लाभार्थी विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान केली जाते.  1)पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती -    इयत्ता 5 वि मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते .ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी एक परीक्षा घेतली जाते परीक्षेमध्ये उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल . 2)पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती-    इयत्ता 8 वि मध्ये शिक्षण घेत असणाऱ्या विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती दिली जाते .ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेण्यासाठी एक परीक्षा घेतली जाते परीक्षेमध्ये उच्च गुणवत्ता धारक विद्यार्थ्यांना ह्या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल . 3)सावित्रीबाई फुले कन्या शिष्यवृत्ती -   इयत्ता 1 ली ते 10 पर्यंत शिक्षण घेत असणाऱ्या मुलींनाच या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येतो.वार्षिक ₹800/-विद्यावेतन मिळते. 4)महाराष्ट्र टॅलेंट सर्च -     इयत्ता 8 वि मध्ये शिक्षण घेत असणारे...