" ग्रामपंचायत " सरकारी योजना कोणत्या ?
ग्रामपंचायत गाव पातळीवर सरकारी योजना राबविण्याचे काम ग्रामपंचायत मार्फत केले जाते.यासाठी प्रत्येक वर्षी या विकास कामासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी दिला जातो .हे कामकाज ग्रामपंचायत मध्ये सरपंच योजना कोणत्या राबवायच्या निधी कसा खर्च करायचा याकडे सरपंच लक्ष देत असतो .ग्रामपंचायत पातळीवर सरकारी कामकाज पाहण्यासाठी ग्रामसेवक या अधिकारी ची नेमणूक केलेली असते .असे कोणकोणत्या सरकारी योजना आहेत .जे ग्रामपंचायत पातळीवर राबविण्यात येतात. ते खालीलप्रमाणे आहेत.
1) समशान भूमी योजना -
गाव पातळीवर समशान भूमी साठी राज्य शासनामार्फत विशेष योजना करण्यासाठी आली असून यासाठी राज्य शासनाकडून विशेष निधी खर्च करण्यात येतो.
2)शौचालय निधी खर्च योजना-
वैयक्तिक शौचालय बांधणीसाठी केंद्र सरकार मार्फत 75% निधी म्हणजे 9000/- रुपये व राज्य सरकार मार्फत 25% म्हणजे 3000/- रुपये दिले जाते .या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्या ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवकला संपर्क करावा .
3)घरकुल योजना -
ही योजना वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रवर्गासाठी ही योजना राबविण्यात येते. जसे अनुसूचित जमाती साठी शबरी आवास योजना ,अनुसूचित जाती साठी रमाई आवास योजना तसेच घटस्फोटीत ,विधवा अशांसाठी यशवंतराव मुक्त वसाहत योजना अंमलात आहेत. या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी शर्ती असून अधिक माहितीसाठी आपल्या ग्रामपंचायत प्रशासकीय अधिकारी ग्रामसेवकशी भेट घ्यावी.
4)महात्मा गांधी रोजगार हमी योजना-
ही योजना खूप वर्षांपासून चालू असून ही योजना आर्थिक दृष्ट्या मागासवर्गीय असणाऱ्या साठी ग्रामपातळीवर ग्रामसेवक या प्रशाकीय अधिकारी मार्फत राबविण्यात येते. यासाठी ज्यांना रोजगार उपलब्ध होत नाही .अशा लोकांनी आपले नाव मनरेगा यादीत नाव आहेत का ते पाहावे यादीत नावे नसल्यास ग्रामसेवकशी संपर्क साधावा. कामाचा मोबदला प्रत्यक्ष आपल्या खात्यात वर्ग केला जातो.
5) ग्राम सडक योजना -
ग्रामपातळीवर अंतर्गत गावात रस्त्याची निर्मिती करण्यात येते . प्रधानमंत्री ग्रामसडक योजना तसेच मुख्यमंत्री ग्रामसडक योजना ह्या दोन योजना आहेत. गावच्या सुविधेसाठी ह्या योजना राबविण्यात येतात.
Comments
Post a Comment