एका गरीब विद्यार्थ्याची जीवन संघर्ष कथा. नाशिक जिल्ह्यातील एका गरीब घरात राहुल नावाचा गरीब होतकरू मुलगा आपल्या आईसोबत वास्तव करीत होता .लहानपणीच राहुलचे वडील देहान्त झाल्याने त्याच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्या आईच्या डोक्यावर आली होती .राहुलला एक लहान बहीण होती .अशा घरात शिक्षण घेणे म्हणजे फारच चुरशीची बाब होती .त्या वेळेसच गाणंही प्रसिध्द होत शिकून कुठं मोठं मास्टर होणार हाय . ज्या घरी खाण्यासाठीच काही नाही तेथे शिकून काय करायचं ,पण राहुलच्या आईला शिक्षणाचे महत्त्व समजले होते म्हणुन राहुलच्या आईने त्याला एका शाळेत दाखल केले. त्यात त्याला मधल्या सुट्टीत मस्त खिचडी भेटायची राहुल थोडी खिचडी आपल्या बहिणीसाठी घेऊन जायचा. राहुल हळूहळू मोठा होत होता आईची तब्येत हळू हळू खराब होत चालली होती ,त्यामुळे राहुल आता वयाच्या 12 व्या वर्षीच सुट्टीच्या दिवशी एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यातून त्याला काही पैसे मिळायचे व खायलाही मिळून जायचे .होटेल मध्ये उरलेले अन्न तो घरी घेऊन जायचा .असेच दिवस एका मागून एक लोटत होते राहुल आता 17 वर्षाचा झाला .आईची ...