Skip to main content

एका गरीब विद्यार्थ्याची जीवन संघर्ष कथा.

 एका गरीब विद्यार्थ्याची जीवन संघर्ष कथा.

   नाशिक जिल्ह्यातील एका गरीब घरात राहुल नावाचा गरीब होतकरू मुलगा आपल्या आईसोबत वास्तव करीत होता .लहानपणीच राहुलचे वडील देहान्त झाल्याने त्याच्या कुटुंबाची सर्व जबाबदारी त्याच्या आईच्या डोक्यावर आली होती .राहुलला एक लहान बहीण होती .अशा घरात शिक्षण घेणे म्हणजे फारच चुरशीची बाब होती .त्या वेळेसच गाणंही प्रसिध्द होत 
शिकून कुठं मोठं मास्टर होणार हाय .
ज्या घरी खाण्यासाठीच काही नाही तेथे शिकून काय करायचं ,पण राहुलच्या आईला शिक्षणाचे महत्त्व समजले होते म्हणुन राहुलच्या आईने त्याला एका शाळेत दाखल केले. त्यात त्याला मधल्या सुट्टीत मस्त खिचडी भेटायची राहुल थोडी खिचडी आपल्या बहिणीसाठी घेऊन जायचा.
   राहुल हळूहळू मोठा होत होता आईची तब्येत हळू हळू खराब होत चालली होती ,त्यामुळे राहुल आता वयाच्या 12 व्या वर्षीच सुट्टीच्या दिवशी एका हॉटेलमध्ये काम करायला सुरुवात केली. त्यातून त्याला काही पैसे मिळायचे व खायलाही मिळून जायचे .होटेल मध्ये उरलेले अन्न तो घरी घेऊन जायचा .असेच दिवस एका मागून एक लोटत होते राहुल आता 17 वर्षाचा झाला .आईची तब्येत आता खुपच खराब झालेली होती त्याला आता काम करणे होत नसल्याने सर्व कुटुंबाची जबाबदारी आता राहुल वर आली. घर चालवत राहुल शिक्षण घेत होता राहुल मॅट्रिक मध्ये चांगल्या गुणाने उत्तीर्ण झाला व त्याला उच्च शिक्षणासाठी शहरात जावे लागणार होते .त्यासाठी त्याला लागणारे पैसेही त्याच्याकडे नव्हते म्हणून राहुल जवळच्या तालुक्यातील महाविद्यालयात प्रवेश घेतला. त्यातच राहुलच्या बहिणीची लग्नाची वय वाढत होता .त्यामुळे राहुल आता सकाळी ,संध्याकाळी कॉलेज सुरू होण्याच्या अगोदर व व कॉलेज संपल्यावर नंतर जवळच्या कारखान्यात जड काम करीत होता .
     त्यातच त्याची आई खूप आजारी पडली त्याला दवाखान्यात 10000 रुपये लागणार होते .त्यामुळे त्याने गावच्या सावकाराकडे गेला व त्याच्याकडे असणारी वडिलोपार्जित 1 एकर जमीन सावकाराकडे गहाण ठेवले. व आपल्या आईला आजारातून मुक्त केले. अशा संकटातून राहुल समोर जात होता त्याचे शिकण्याची जिद्द कायम होती .आता त्याचे पदवीचे शिक्षण पूर्ण झाले .नौकारीसाठी तो जागोजागी फिरत राहायचं पण सगळीकडे नौकारीसाठी लाच मागत असे. त्यामुळे राहुलला कुठेच नौकारी मिळत नव्हती .शेवटी राहुल निराश होऊन कारखान्यात काम करायला लागला व रात्री उशिरापर्यंत अभ्यास करू लागला .असेच 2 वर्ष सुरू होते .आईला घरचे काम सुध्दा होत नसल्याने राहुल च घरचे सर्व काम करीत होता .त्यातच राहुलच्या बहिणीचे लग्न ठरले व वरवधुला वरदक्षणा म्हणुन 25000 द्यावे लागण होते.घरची जमीन पण सावकाराकडे गहाण होती .आता काय करावे असा प्रश्न राहुलला पडला त्याने जमा केलेले केवळ 5 हजार होते .बाकीचे 20 हजार त्याने कारखान्याच्या मालकाकडून उदार आणले त्या मालकाला राहुलचा स्वभाव खूप आवडतं होता कारण राहुलचे काम सर्वात चांगले होते म्हणून राहुलला कायमस्वरूपी आपल्या कारखान्यात काम करण्याच्या अटीवर त्याने राहुलला 20 हजार दिले .त्याच्या बहिणीचे थाटात लग्न करून दिले.
     आता राहुलकडे काहीच उरले नव्हते .तो आता केवळ 6 तास झोपायचा बाकी 8 तास तो कारखान्यात काम करायचा व उरलेल्या वेळात तो आता नुसता अभ्यास करू लागला .नुसती धावपळ त्याच्यामागे लागली त्याच वर्षात तो राज्यसेवा ची मुख्य परीक्षेत मजल मारली पण शेवटी मुलाखतीमध्ये तो बाहेर पडला .राहुल निराश न होता परत अभ्यासाला लागला .परत तीच दिनचर्या चालू झाली या वेळेस आता मोठ्या जिद्दीने तो अभ्यास करू लागला  व त्याने राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊन उपजिल्हाधिकारी हे पद मिळवून आपल्या जिद्दीला सलाम केले. राहुल अशा गरीब परिस्थिती मधून राज्यसेवा परीक्षा उत्तीर्ण होऊ शकतो तर आपण का करू शकत नाही. यातून काही शिकलं पाहिजे.

Comments