जिल्हा परिषदेच्या " शेळी वाटप योजना "चे नवे नियम /अटी व शर्ते .
जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत गरजूंना किंवा जे शेळी पालन व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी शेळी वाटप योजना आहे .ही योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते .या योजनेची अटी शर्ते खालीलप्रमाणे आहेत .
ज्या प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे असा प्रवर्ग -
लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध असावा .
या योजनेची प्रमुख अटी -
1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे.
2)वरील प्रमाणे नमूद केल्याप्रमाणे लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध असावा .
3)दि 01 /05 /2001 नंतर दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये नसावेत.
4)लाभार्थी मध्ये 33% महिला लाभार्थी असावेत .
शेळी गट वाटप /अर्थिक सहाय्य-
या योजनेनुसार लाभार्थीस एक शेळी गट ज्यामध्ये 10 शेळी व एक बोकड असा शेळीचा गट मिळतो .यामध्ये 75%अनुदान तर 25%वित्तीय /बँकिंग संस्थाचे कर्ज स्वरुपात लाभ मिळतो .प्रति बोकड 7000 /- व शेळी प्रति शेळी 6000/- याप्रमाणे 10 शेळीचे 60000 व बोकडचे 7000 असे ऐकून 67000 /- प्रति लाभार्थीला मिळेल यामधून शेळीचा विमा 2.25% - 4239 ₹ असे एकूण 71239 रुपये लाभार्थीस मिळतात यांपैकी 75 % हे अनुदान मिळते म्हणजे 71239 यापैकी 75 % रक्कम ही अनुदान म्हणजे 53429 /- ही रक्कम अनुदान म्हणून लाभार्थ्यांना मिळेल व बाकी असणारी रक्कम ही कर्ज स्वरूपात मिळेल .
अर्ज करण्याची पद्धत - जिल्हा परिषदेचे पशुसंवर्धन विभागास भेट द्यावी त्याठिकाणी किंवा आपल्या संबंधित ग्रामसेवक यास संपर्क साधावा.
Comments
Post a Comment