Skip to main content

महाराष्ट्रातील सर्व सरकारी भरती प्रक्रिया आता MPSC आयोगामार्फतच राबविली जाणार आहे .

 महाराष्ट्रातील सर्व सरकारी भरती प्रक्रिया आता MPSC आयोगामार्फतच राबविली जाणार आहे . 


    महाराष्ट्र राज्यात भरती प्रक्रियामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारच्या सरकारी भरती यापुढे MPSC आयोगामार्फत घेण्यात येणार आहे .अगोदर महाराष्ट्र राज्यात वर्ग 1 ,वर्ग 2 च्याच अधिकारी वर्गातील भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत होत्या . व वर्ग 3 ,व वर्ग 4 कर्मचारी यांची निवड प्रक्रिया महापरिक्षा या पोर्टल द्वारे राबविण्यात येत होती .

       या भरती प्रक्रिया मध्ये खाजगी कंपनीना टेंडर दिले जाते .ऑनलाईन परीक्षा निवड प्रक्रिया अश्या खाजगी कंपनी मार्फत राबविण्यात येत असे त्यामुळे उमेदवारांच्या मनात भ्रष्टाचार होत असल्याबाबत तक्रारी वारंवार येत होत्या भरती प्रक्रिया मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे असल्याने  यापुढे होणारी सर्व वर्गातील भरती प्रकिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत केली जाणार आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात पारदर्शकता येणार हे सत्य आहे .यामुळे उमेदवारांना याचा खूप फायदा होईल असे उमेदवारांचे म्हणणे आहे .

Comments