Skip to main content

महाराष्ट्र प्रशासन पुन्हा लॉकडाउनच्या तयारीला लागले .

 महाराष्ट्र प्रशासन पुन्हा लॉकडाउनच्या तयारीला लागले .

        महाराष्ट्र मध्ये सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहेत .विशेष म्हणजे आता ग्रामीण भागातही हा आकडा मोठा आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरी भागात कोरोनाचे रुग्ण संख्येने जास्त होती शिवाय मृत्यू दरही जास्त होता. पण आता मृत्यू दर हा कमी आहे. ग्रामिण भागात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. हा आकडा रोज हजार च्या दरम्यान असल्याने ही खूप चिंतेची बाब आहे .तसेच रिपोर्ट नुसार भारतातील सर्वात जास्त टॉप 10 शहराच्या यादीत महाराष्ट्रचे टॉप 10 मध्ये क्रमाने पाहिले 9 शहर महाराष्ट्रातील आहेत .भारतातील गुजरात राज्याने कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन राज्यात किंचित लॉकडाउन  करण्यात आले असून राज्याच्या सीमा बंद करण्यात आले आहेत.

    याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने लॉक डाउन चा प्रस्ताव प्रशासनावर टाकला असून याची चाचपणी चालू असून या लॉक डाउन मध्ये जास्त नुकसान होणार नाही याची काळजी घेत आहेत. सध्या तरी लॉक डाउन होणार नसून त्याची चाचपणी प्रशासन करीत आहेत. शिवाय सध्या रात्री संचारबंदी लागू करण्यात आली आहेत .तसेच शनिवार ,रविवारी मोठ्या शहरात संपूर्ण बंद करण्यात येत आहेत. ग्रामीण भागातील आडवडी बाजार पुन्हा बंद करण्यात आले आहेत.तसेच प्रशासनाने कोरोनाचे टेस्टिंगमध्ये वाढ करण्यात आले आहे.
  प्रत्येक जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या दिवसेंदिवस खूप वाढत असल्याने लॉक डाउन चा विचार ठाकरे सरकार घेण्याचा विचार करीत असल्याचे दिसून येत
आहेत.

Comments