Skip to main content
MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ?
MPSC विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या काय आहेत ?
सध्या महाराष्ट्रभर MPSC ची तयारी करणारे विद्यार्थी आंदोलन करत आहेत .त्याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र लोक सेवा आयोगाकडून MPSC ची परीक्षा तारीख पुढे ढकलण्यात आली .ही चौथी वेळेस परीक्षा पुढे ढकलली असल्याने mpsc करणाऱ्या विद्यार्थ्यांचे रोष अनावर झाले नाही .त्यामुळे हे आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रभर करण्यात आले.ह्या आंदोलनाची सुरुवात पुण्यातील विद्यार्थ्यांकडुन करण्यात आले.यामध्ये विद्यार्थ्यांच्या सोबत महाराष्ट्र स्पर्धा परीक्षा संघटना सहभागी झाली होती.
विद्यार्थ्यांच्या प्रमुख मागण्या -
1) mpsc ची परीक्षा पुढे न ढकलता परीक्षा घेण्यात यावेत . परीक्षेचे स्वरूप स्थिर ठेवावे . परिक्षा ही दिलेल्या तारखेलाच व्हावी .कारण यामुळे काही उमेदवारांचे वय बाद होऊन जाते.
2) जागा वाढवावेत. लॉकडाऊन मुळे गेल्या वर्षी पासून mpsc ची परीक्षा झाली नसल्याने वाढीव जागा काढावेत .सर्व संवर्ग निहाय जागा उपलब्ध करून द्यावेत .
3) कंत्राटी स्वरूपात भरण्यात येणारी पदे ही कायम स्वरूपात भरण्यात यावीत .सरळसेवा मधील भरपूर जागा रिक्त असून त्याचा प्रशासनावर ताण निर्माण होत आहे.तरी अशी पदे लवकरात लवकर भरावीत .
4)कोरोनाचा बहाणा सांगून परिक्षा पुढे ढकलू नये .आम्ही मास्क वापरू हात सनेटाइझ करू परंतु परीक्षा घ्यावी असे विध्यार्थ्यांचे म्हणणे आहेत.
Comments
Post a Comment