नाशिक महानगरपालिका मध्ये ऑक्सिजन गळती मुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू .
नाशिक महानगरपालिका मध्ये ऑक्सिजन पुरवठा गळती मुळे तब्बल 22 कोरोना रुग्णाचा आज दुपारी मृत्यू झाला आहे .याबाबत सर्व स्तरावरून हळहळ व्यक्त करत आहे .या घटणेसाठी स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याने सर्व स्तरावरून यावर टिका होत आहेत .
ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्यू मुखी पडले .यासाठी सर्व बाजूंनी स्थानिक प्रशासनास जबाबदार धरले असून केंद्र स्तरावरून याबाबत हळहळ व्यक्त केली आहे. परत असे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनास सक्त ताकीत देण्यात आले आहे .शिवाय महाराष्ट्र राज्यामध्ये ऑक्सिजन बेडची अपुरी पडणारी संख्या लक्षात घेता केंद्राने याकडे लक्ष देऊन महाराष्ट्र राज्यास ऑक्सिजन पुरवठा वाढवावा अशी आशा व्यक्त केली आहे .
रुग्णाला ऑक्सिजन बेडसाठी वेटिंग करावी लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईक कडून तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत .
Comments
Post a Comment