Skip to main content

महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा सर्वमताने रद्द करण्याचा सर्वात मोठा निर्णय.

 महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा सार्वमताने रद्द करण्याचा सर्वात मोठा निर्णय.

  महाराष्ट्र राज्य सरकारने दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे .याचे मुख्य कारण माझा सध्या महाराष्ट्र मध्ये कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे .त्याचबरोबर केंद्र सरकारने अगोदरच CBSE  दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत .केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सार्वमताने घेण्यात आला आहे .

   यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा बाबत होणारा संभ्रम दूर झाला आहे .काही विद्यार्थी व पालकांना परीक्षा व्हावी असे वाटत होते ,परंतु कोरोनाचा कहर लक्षात घेता ,व विद्यार्थी व जनतेच्या आरोग्याचा विचार करता परीक्षा रद्द करणे हाच पर्याय महाराष्ट्र सरकार कडे उरल्याने ,अखेर महाराष्ट्र सरकारने दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली .

    लॉकडाउन  अधिक कडक करण्याचे संकेतही देण्यात आले आहे .मा .मुख्यमंत्री यांनी लॉकडाउनचे नियम पाळण्याचे आव्हान केले आहे .व प्रशासनास सहकार्य करण्याचे आव्हान केले आहे .

Comments