राज्य शासनाकडून नवी नियमावली जाहीर .
महाराष्ट्र राज्य शासनाकडून कोरोना महामारीमुळे अनेक निर्बंध घालण्यात आले होते .आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्बंधाबाबत नवी नियमावली जाहीर करण्यात आले असून आज आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन सांगितले आहे .
* नवी नियमावली *
- सर्व हॉटेल ,रेस्टॉरंट 50 %क्षमतेने रात्री 10 वाजेपर्यंत चालू राहतील .
- लग्न समारंभ साठी 100 जणांना परवानगी देण्यात आली असून खुल्या स्वरूपातील मंगल कार्यालय मध्ये 200 जणांना परवानगी देण्यात आली आहे .
- सर्व शासकीय ,निमसरकारी व महामंडळाचे आस्थापना 100 % क्षमतेने सुरु राहतील परंतु कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे .
- सर्व प्रकारचे खाजगी कार्यालये 24 तास चालू राहतील परंतु कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण असणे आवश्यक आहे .
- रेल्वेने प्रवास करण्यासाठी लसीचे दोन्ही डोस पूर्ण होणे आवश्यक आहे .दुसरा डोस घेतल्यानंतर 14 दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे .
- शाळा ,महाविद्यालय बाबत पुन्हा चर्चा होणार आहे .
- शॉपिंग मॉल्स ,शॉप रात्री 10 पर्यंत चालू राहतील दुकानदार ,विक्रेत्यांना रात्री 10 पर्यंत दुकान चालू ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे .परंतु दुकानदार व विक्रेत्यांचे व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण होणे आवश्यक आहे .
* काय बंद असतील *
- सर्व सिनेमा गृहे बंद असतील.
- धार्मिक स्थळे ,मंदिरे तूर्तास बंद असतील .
Comments
Post a Comment