Skip to main content

लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते ?

 लग्नानंतर स्त्रियांचे वजन का वाढते ?

   शरीर आकर्षक दिसण्यासाठी शरीर सडपातळ असल्यास जास्त आकर्षक वाटते .हे जास्त करून स्त्रियांच्या बाबतीत स्त्री सडपातळ असल्यास जास्त आकर्षक वाटते .लग्ना अगोदर स्त्री सडपातळ असली तरी लग्न झाल्यास 2 ते 5 वर्षांमध्ये स्त्रियांचे वजन मोठ्या प्रमाणात वाढून जाते .यामुळे सडपातळ शरीर लठ्ठ होऊन जाते .याचे काही कारणे आहेत ज्यामुळे शरीर लग्नानंतर लठ्ठ होते .हे बहुतांश स्त्रियांच्या बाबतीत असे घडते . क्वचित स्त्रियांच्या बाबतीत असे घडत नाही .लग्नानंतर शरीर लठ्ठ होण्याचे करणे खालीलप्रमाणे आहेत .


1) स्त्रीयांच्या बाबतीत लग्न झाल्यास बहुतांश स्त्रिया ह्या गृहिणी म्हणून घरीच असतात .त्यामुळेच स्त्रिया लग्नानंतर घरीच राहतात .जास्त फिरणे किंवा शारीरिक कामे कमी होतात .यामुळे शरीराची जास्त हालचाल होत नाही केवळ बैठे कामच केले जाते यामुळे लग्नानंतर स्त्रियांचे वजन वाढते .


2) स्त्रिया लग्न झाल्यास जास्त करून घरीच असतात .त्यामुळे घरी चविष्ट पदार्थ करून खातात .जसे की,चिप्स ,तळलेले पदार्थ सारखे दिवस भर खात राहतात .ज्यामुळे शरीराची चरबी वाढते .यामुळे वजन वाढते .


3)लग्नानंतर स्त्रियांचे मानसिक ताण थोडा कमी होतो ,जे की लग्ना अगोदर खूप ताण असते .लग्न झाल्यास मानसिक ताण जे आर्थिक बाबत किंवा इतर बाब आपल्याकडे पुरुष पहातात .यामुळे स्त्रियांचे मानसिक ताण कमी झाल्याने आहार शरीरास पोषक ठरते .व वजन वाढू लागते .


4)स्त्रियांचे लग्नानंतर वजन वाढण्याचे कारण काहीजण लैंगिक संबंधाशी जोडले जाते .काही अंशी हे सुध्दा चुकीचे नाही ,परंतु लैंगिक संबंधामुळेच वजन जास्त प्रमाणात वाढते हे म्हणने चुकीचे राहील .

5) हार्मोन मध्ये लग्नानंतर बदल होते .या बदलामुळे स्त्रियांचे वजन वाढण्यास कारणीभूत ठरते .जे की,लग्ना अगोदर हार्मोन कमी असतात .लग्न झाल्यास या हार्मोन मध्ये अचानक मोठी वाढ होते.

Comments