राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता कधी मिळणार ?
केंद्रीय कर्मचाऱ्यांना 31 % प्रमाणे महागाई भत्ता लागू करण्यात आला आहे .या व्यतिरिक्त केंद्रीय कर्मचाऱ्यांना मागील 18 महिने गोठवलेला महागाई भत्ता बाबत वन टाइम सेटलमेंट करावी अशी मागणी केंद्र सरकारसमोर करण्यात आली आहे .
राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे वाढीव महागाई भत्ता व इतर भत्ते लागू करण्यात येतात .केंद्र सरकारने वाढीव 3 % महागाई भत्ता बाबत निर्णय घेतला असून राज्य सरकारने अद्याप याबाबत निर्णय घेतले नाहीत .
राज्य सरकारी कर्मचारी संघटनांकडून वाढीव महागाई भत्ता व मागील 18 महिने महागाई भत्ता बाबत केंद्राप्रमाणे वन टाइम सेटलमेंट करण्यात यावी, अशी मागणी राज्य सरकारकडे केली आहे .त्याचबरोबर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना सुध्दा मागील गोठवलेला महागाई भत्ता बाबत लवकर निर्णय घेण्यात यावी अशी मागणी करण्यात येत आहेत .
याबाबत महाराष्ट्र राज्य सरकारकडून सकारात्मक भूमिका मांडत याबाबत डिसेंबर अखेर निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे .राज्य सरकार यावर लवकरच निर्णय घेईल आणि केंद्राप्रमाणे वाढीव 3 % महागाई भत्ता लागू होईल .
Comments
Post a Comment