Skip to main content

Posts

Showing posts from February, 2021

यवतमाळ येथे जिल्हा कार्यालयात वाहन चालक (ड्रायव्हर) पदाच्या 7 जागांसाठी भरती.

 यवतमाळ येथे जिल्हा कार्यालयात वाहन चालक (ड्रायव्हर) पदाच्या 7 जागांसाठी भरती.     यवतमाळ जिल्ह्यातील जिल्हा तसेच तालुकापातळीवर रिक्त पदापैकी वाहनचालक पदांची भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे सदर पद भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहे. शैक्षणिक पात्रता - 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच मराठी लिहिता वाचता येणे आवश्यक आहे.तसेच मोटार जड वाहन परवाना असणे आवश्यक असून परवाना हा तीन वर्ष अगोदर चा असावा. तसेच मोटार दुरुस्तीचे कामाचे अनुभव असावे. वयोमर्यादा - 18 वर्षापेक्षा कमी नसावे व 45 वर्षापेक्षा जास्त नसावे . वेतन - सदर भरती ही कंत्राटी पद्धतीने असल्याने वेतन हे मानधन स्वरूपात ₹ 9145/- रुपये मासिक मानधन मिळेल . सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

कर्जत उपजिल्हा रुग्णालयात विविध पदांच्या 6 जागांसाठी भरती

 रायगड जिल्ह्यातील कर्जत उपजिल्हा रुग्णालयात विविध 6 पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत .    कर्जत उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदांवर कर्ज मागविण्यात येत असून सादर भरती प्रक्रिया ही कंत्राटी पद्धतीने 11 महिन्याच्या करार पद्धतीने भरण्यात येणार आहे .रिक्त पदाचा तपशील खालीलप्रमाणे आहे . 1) वैद्यकीय अधिकारी - जागा = 01 .शैक्षणिक पात्रता= MBBS उत्तीर्ण असणे आवश्यक आहे तसेच अनुभव आवश्यक आहे .मासिक एकत्रित मानधन ₹ 60000/- . 2) परिचारिका -जागा = 02 शैक्षणिक पात्रता =ANM/GNM उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन ₹ 20000/- 3) आहारतज्ञ -जागा =02 शैक्षणिक पात्रता =MSC/BSC FOOD NITRITION उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन ₹ 20000/- 4) स्वयंपाकी (फक्त स्त्रियांसाठी) -जागा =01 शैक्षणिक पात्रता 8वि ते 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन ₹15500 /-  5) परिचर (फक्त स्त्रियांसाठी)- जागा =02 शैक्षणिक पात्रता 8वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मासिक एकत्रित मानधन ₹ 15500/- दि 05/03/2021 रोजी थेट मुलाखत आयोजित करण्यात आली आहे या पदांसाठी कोणतीही लेखी परीक्...

महाराष्ट्र वन विभाग नागपूर येथे 10 जागांसाठी मनुष्यबळ निविदा मागविण्यात येत आहे.

 महाराष्ट्र वन विभाग नागपूर येथे विविध पदांच्या 10 जागांसाठी निविदा मागविण्यात येत आहेत .   महाराष्ट्र वन विभागामध्ये रिक्त असलेल्या 10 पदांचा रिक्त पदावर भरती निविदा मागविण्यात येत असून रिक्त पदांचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. सिनियर अकाउंट असिस्टंट पदांची 1 जागा. ऑफिस असिस्टंट पदांची 2 जागा. सुरक्षा रक्षक पदांची 3 जागा. कार्यालय मदतनीस पदांचा 1 जागा. वाहनचालक पदांची 1 जागा. माळी पदांची 1 जागा. स्वीपर पदांची 1 जागा. वरील पदांसाठी मनुष्यबळ पुरवठा करायचा असल्याने दि 08.03.2021पर्यंत आपले निविदा सादर करावे .हे टेंडर 11 महिने कालावधीसाठी असून कामाच्या स्वरुपानुसार त्यात काढ करण्यात येईल.  सविस्तर निविदा जाहिरात पाहा -  CLICK HERE

लातूर जिल्हा परिषद -प्राथ. शिक्षण विभाग मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 3 जागांसाठी भरती

 लातूर जिल्हा परिषद -प्राथ. शिक्षण विभाग मध्ये डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांच्या 3 जागांसाठी भरती   लातूर जिल्हा परिषदेत ( zp) प्राथमिक शिक्षण विभाग मध्ये शालेय पोषण आहार अंतर्गत तालुका पातळीवर डेटा एन्ट्री 3 पदांसाठी कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया याबविण्यात येत आहे.   पदाचे नाव - डेटा एन्ट्री ऑपरेटर (कंत्राटी पद्धतीने मानधन तत्वावर)  मिळणारे मानधन - 15900 /-मासिक मानधन दिले जाईल. शैक्षणिक पात्रता -   उमेदवार 12वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच उमेदवार मराठी 30 टंकलेखन व इंग्रजी ४० टंकलेखन ऊत्तीर्ण असणे आवश्यक आहे.तसेच MSCIT किंवा ccc उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया कशी असेल .   10 गुणांची टक्केवारी व 12 वि गुणांची टक्केवारी नुसार मिरीट लावण्यात येईल .पदवीधर असल्यास 10 गुण बोनस स्वरूपात अधिक गुण देण्यात येईल.   अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पहावे. जाहिराती पाहा

ऑनलाईन कमाई करण्याचे प्रभावी साधन

  ऑनलाईन कमाई करण्याचे प्रभावी साधन     ऑनलाईन पद्धतीने प्रभावी कमाई करण्याचे खरच साधन सध्या उपलब्ध आहेत का ? असतील तर ते कोणते ? याचे प्रभावी उत्तर पाहुयात. होय ऑनलाईन साधनांचा वापर करून चांगली कमाई करू शकतो .यामध्ये ऑनलाईन वर्क करण्याचे फ्रॉड भरपूर असतात ऑनलाईन वर्क करा असे म्हणून काही फीस आकारणी केली जाते.व ऑनलाईन वर्क केल्यानंतर त्याचा मोबदलाही दिला जात नाही.त्यांच्यासोबत froud केले जाते .     परंतु ऑनलाईन कमाई करण्याचे प्रभावी साधन म्हणजे ऑनलाईन काम करून त्याचा मोबदला मिळाला पाहिजे असे काही साधन आपण पाहुयात . 1) ब्लॉगर (blogger)      ऑनलाईन पद्धतीने ब्लॉगर तसेच वर्डप्रेस यांच्या माध्यमातून आपल्या आवडीनुसार लेख ,कथा ,गोष्टी तसेच कविता यासारखे लिखाण करून ब्लॉगर तसेच वर्डप्रेस यावर पब्लिश करावे व  साईडवर ऍड लावून कमाई करू शकतो यासाठी तुमच्या ब्लॉगर किंवा वर्डप्रेस साईड वर ऍड तसेच व्हिउज आले पाहिजेत .यातून आपल्या ला प्रभावी कमाई होऊ शकते. हे पण वाचा - रिचार्ज करून पैसे कमवा हे पण वाचा - घरी बसून करता येणारे व्यवसाय हे पण वाचा - REFER करून प...

ICICI ,HDFC व इतर खाजगी बँकेत जॉब कसे मिळते ?

  ICICI ,HDFC व इतर खाजगी  बँकेत जॉब कसे मिळते ?      PGDBO हे एक डिप्लोमा असून हे पूर्ण केल्यानंतर ICICI, HDFC व इतर मानांकित बँकेत जॉब मिळतो .PGDBO - POST GRADUCATION DIPLOMA IN BANKING OPARATION असे डिप्लोमा चे नाव असून हे डिप्लोमा केल्यानंतर जॉब ची 100%गॅरंटी असते शिवाय हे डिप्लोमा करण्यासाठी प्रथम बँकेमार्फत मुलाखत घेतली जाते .निवड झालेल्या उमेदवारानाच हे डिप्लोमा करता येतो .  शैक्षणिक पात्रता - उमेदवार हा पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे विशेष म्हणजे वाणिज्य शाखा तसेच MBA इन फायनान्स या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येते. बॅंकेत कोणती पोस्ट मिळते .     1) सिनियर ऑफीसर     2) कॅशियर     हे डिप्लोमा केल्यानंतर त्यांना बँकेत Value Banker  असे म्हटले जाते .  हा जॉब बँकेच्या कायमस्वरूपी कर्मचारी म्हणून संबोधला जातो. पगार -  5200-20200 वेतनश्रेणी अशी असते   कालावधी - हा डिप्लोमा 6 महिनेचा असतो. त्यानंतर 3 महिने ट्रेनिंग कालावधी असते या तीन महिन्यात 7000 एवढे स्टायपेंड मिळतो.त्यानंतर रेग्युलर पगार 5200 -202...

PNB या सरकारी बँकेत शिपाई पदासाठी 16 जागांची भरती

PNB  या सरकारी बँकेत शिपाई पदासाठी 16 जागांची भरती        पंजाब नॅशनल बँक ही एक सार्वजनिक क्षेत्रातील अग्रणी बँक आहे .या बँकेत शिपाई पदासाठी 16 जागेवर अर्ज मागणी करण्यात येत आहे.कोल्हापूर मंडळ साठी ही भरती असून यामध्ये कोल्हापूर, सांगली, सातारा,सोलापूर, लातूर,दक्षिण गोवा व उत्तर गोवा या ठिकाणी असणाऱ्या PNB शाखेसाठी भरती प्रक्रिया आहे. अर्ज कोण करू शकतो. 1) 1 जानेवारी 2021 रोजी उमेदवाराचे वय 18 ते 24 वर्षे असणे आवश्यक आहे. 2) 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे . 3)त्याच जिल्हातील रहिवासी असणे आवश्यक आहे. निवड प्रक्रिया कशी असेल .   निवड प्रक्रिया ही 10 वि व 12 वीच्या मार्कच्या आधारे केली जाणार आहे.10 वि टक्केवारीला 40 गुण देण्यात येईल व 12 वीच्या टक्केवारीला 60 गुण देण्यात येईल .यानुसार निवड प्रक्रिया होईल अर्ज कोठून प्राप्त होईल      अर्ज सादर करण्यासाठी जिल्ह्यातील PNB शाखेत अर्ज प्राप्त होईल तो लिहून कोल्हापूर मंडळ कार्यालयात सादर करावे . अधिक माहिती आवश्यक असल्यास - marathinewsmh.gmail.com  या मेल वर मेल करून मूळ जाहिरात तसेच अर्ज send कर...

महाराष्ट्रातील सर्व सरकारी भरती प्रक्रिया आता MPSC आयोगामार्फतच राबविली जाणार आहे .

 महाराष्ट्रातील  सर्व सरकारी भरती प्रक्रिया आता MPSC आयोगामार्फतच राबविली जाणार आहे .      महाराष्ट्र राज्यात भरती प्रक्रियामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आता महाराष्ट्र शासनाने सर्व प्रकारच्या सरकारी भरती यापुढे MPSC आयोगामार्फत घेण्यात येणार आहे .अगोदर महाराष्ट्र राज्यात वर्ग 1 ,वर्ग 2 च्याच अधिकारी वर्गातील भरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येत होत्या . व वर्ग 3 ,व वर्ग 4 कर्मचारी यांची निवड प्रक्रिया महापरिक्षा या पोर्टल द्वारे राबविण्यात येत होती .        या भरती प्रक्रिया मध्ये खाजगी कंपनीना टेंडर दिले जाते .ऑनलाईन परीक्षा निवड प्रक्रिया अश्या खाजगी कंपनी मार्फत राबविण्यात येत असे त्यामुळे उमेदवारांच्या मनात भ्रष्टाचार होत असल्याबाबत तक्रारी वारंवार येत होत्या भरती प्रक्रिया मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत असल्याचे उमेदवारांचे म्हणणे असल्याने  यापुढे होणारी सर्व वर्गातील भरती प्रकिया ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मार्फत केली जाणार आहे.यामुळे मोठ्या प्रमाणात पारदर्शकता येणार हे सत्य आहे .यामुळे उमेदवारांना याचा खूप फाय...

SHARE MARKET मधून जास्त कमाई कसे करावे .

  SHARE MARKET मधून जास्त कमाई कसे करावे . Share म्हणजे काय ?     Share म्हणजे मराठी भाषेत समभाग असा अर्थ होतो .भारतात share मार्केटचे दोन मार्केट आहेत 1) BSE  2) NSC असे दोन मार्केट असून एखाद्या कंपनीमध्ये आपल्याला मालकी स्वरूपात गुंतवणूक करायची असल्यास त्या कंपनीचे share विकत घेणे जेणेकरून आपल्याला आपण घेतलेल्या share च्या प्रमाणात कंपनी ची मालकी आपल्याला मिळते .तसेच विशिष्ट कालावधी मध्ये कंपनी share holder ला लाभांश देते . Share मार्केट मधून कमाई कसे करु शकतो. 1)आपण घेतलेल्या share वर कंपनी लाभांश देते. 2) ट्रेडिंग करून पैसे कमविणे           ट्रेडिंग हा एक पैसे कमविण्याचा चांगला पण रिस्की बाब आहे. यामध्ये trader ज्या दिवशी share घेतात त्याच दिवशी share विकतात कमी किंमत लेव्हल ला खरेदी करून जास्त किंमतीला विक्री करतात . 3) डिलिव्हरी ट्रेडिंग           या प्रकारामध्ये share खरेदी केल्यानंतर त्याच दिवशी विक्री न करता खरेदी केल्याचा दिवस सोडून दुसऱ्या दिवसी त्याची विक्री केली जाते .यामध्ये TRADER ज्या दिवशी क...

गाव पातळीवर करा हे BUSINESS कमवा लाखो रुपये

गाव पातळीवर करा हे BUSINESS कमवा लाखो रुपये.    ग्रामीण भाग असेल तर त्या ठिकाणी सुशिक्षित बेरोजगार असणारे तरुण गाव पातळीवरच BUSINESS चालू करून स्वतः च मासिक उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळवू शकतो .असे कोणते व्यवसाय आहेत जे ग्रामीण भागात करता येतील ते खालीलप्रमाणे सांगता येतील. कमी भांडवलीचे व्यवसाय 1) आपले सरकार सेवा केंद्र         गाव पातळीवरच आपले सरकार सेवा केंद्र चालू करून चांगल्या पद्धतीने उत्त्पन्न मिळवू शकतो . यामध्ये प्रामुख्याने उत्पन्न दाखला, जातीचा दाखला, रहिवासी दाखला, नॉन क्रिमिलयेर दाखला असे प्रमाणपत्र ऑनलाईन आपल्या गाव पातळीवरच चालू करू शकतो . 2) आधार कार्ड सेवा केंद्र        सध्या आपल्या देशात सर्वात महत्त्वाचे ओळखपत्र म्हणजे आधारकार्ड आहे.आणि ही सेवा निरंतर चालणारी सेवा आहे .कारण नविन आधारकार्ड काढणे त्यात दुरुस्ती करणे वारंवार चालूच असते त्यामुळे ग्रामीण पातळीवरच ही सेवा देऊन चांगले उत्पन्न मिळवू शकतो. 3) ग्राहक सेवा केंद्र       कोणत्याही बँकेचे मिनी बँक चालू करू शकतो व बँकिंग सेवा आपल्या गाव पात...

चालू घडामोडीचा अभ्यास कसा करावा.

  चालू  घडामोडीवर कोणते प्रश्न विचारले जातात ?    स्पर्धा परीक्षा मध्ये सर्वात कठीण असणारे प्रश्न म्हणजे चालू घडामोडीचे परंतु याचा अभ्यास काही मुद्द्याला धरून अभ्यास केल्यास चांगले गुण मिळतात .चालू घडामोडींचे प्रश्न कश्या पध्दतीने विचारले जातात .ते खालील मुद्याप्रमाणे सांगता येतील . 1) महाराष्ट्र स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर रोज लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, व कोणताही एक इंग्रजी वर्तमानपत्र असे तीन वर्तमानपत्र वाचावे .व जे महत्त्वाचे असेल त्यांची नोट्स काढून घ्यावी. 2) नोट्स काढताना राजकिय ,सामाजिक, सांस्कृतिक, क्रिडा असे वेगवेगळ्या विभागणी करून नोट्स काढावेत . 3)सर्वात महत्त्वाचे म्हणजे जर एखादी माहिती जसे उदा. धूमकेतू विषयी असेल तर त्याचा पूर्ण अभ्यास करणे आवश्यक आहे कारण त्याविषयी परीक्षेत विचारले जातात. 4)कोणतेही एक मासिक वाचावे.व सकाळ चे एअर बुक येतात ते वाचावे. 5) पुरस्कार चा अभ्यास करताना केवळ राष्ट्रीय राज्य पातळीवर चे तसे विशेष पुरस्कार यांचाच अभ्यास करावा.स्थानिक पातळीवरचे पुरस्कारांचा अभ्यास करू नये.  6)चालू घडामोडींचा व इतिहास, भूगोल, अर्थशास्त...

महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक पात्रता.

  महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी आवश्यक पात्रता.       महाराष्ट्र पोलीस भरती  साठी पोलीस शिपाई या पदासाठी आवश्यक पात्रता नेमकी काय असते हेच काहींना माहीती नसते त्यामुळे  त्यांच्यासाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे.     शैक्षणिक पात्रता  -   1) 12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .  2) MSCIT किंवा CCC उत्तीर्ण असणे आवश्यक आहे .     शारीरिक पात्रता -  1) ऊंची  कमीत कमी 165 से.मी.असणे आवश्यक आहे .  2) छाती न फुगवता 79 से.मी. तर 5 से.मी.छाती फुगवणे आवश्यक आहे.     इतर लागणारे आवश्यक कागदपत्रे -  1) उमेदवार आरक्षण मध्ये मोडत असल्यास तो जातीचा दाखला ज्या जातीच्या आरक्षण साठी नॉन क्रिमिलयेर आवश्यक आहे .त्या उमेदवार चे नॉन क्रिमिलयेर प्रमाणपत्र  2) महाराष्ट्र राज्याचे रहिवासी प्रमाणपत्र  3)10 वी मार्कशीट व प्रमाणपत्र 4) 12 वी मार्कशीट व प्रमाणपत्र 5) महिला उमेदवारांसाठी लग्न झाल्यास विवाह प्रमाणपत्र 6) आधारकार्ड 7) MSCIT /CCC प्रमाणपत्र      

महाराष्ट्र राज्य वर्ग 4 शिपाईचा पगार किती आहे ?

 महाराष्ट्र राज्य वर्ग 4 शिपाईचा पगार किती आहे ?      महाराष्ट्र राज्य सरकारच्या शासन सेवेत काम करणाऱ्या वर्ग 4 शिपाईचा पगार किती आहे हे खालीलप्रमाणे जाणून घेवू .  सातवा वेतन आयोगानुसार राज्य सरकारच्या शिपाई चा पगार हा खलील प्रमाणे .नियुक्ती च्या पहिल्या वर्षाचा पगार              मूळ पगार                                         15000         सध्याची महागाई भत्ता  (17%)              2550         NPS     (10%)                                 1755         DCPS   (14%)                                 2460         HRA रा...

महाराष्ट्र पोलीस भरतीतील विविध पद प्रकार जाणून घ्या.

महाराष्ट्र पोलीस भरतीतील  विविध पद प्रकार        महाराष्ट्र पोलिस भरती मध्ये विविध प्रकारच्या पदासाठी भरती निघतात परंतु ग्रामीण भागातील उमेदवारांना याविषयी माहिती नसते त्यामुळे ते केवळ पोलीस शिपाई या पदासाठीच अर्ज करतात. महाराष्ट्र पोलीस भरती मध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येते.ते खालीलप्रमाणे आहेत. 1) कारागृह पोलीस शिपाई  पात्रता   -  12 वी ऊत्तीर्ण परीक्षेतचे स्वरूप - प्रथम शारीरिक क्षमता चाचणी व त्यानंतर  शारीरिक चाचणीत पात्र ठरलेल्या उमेदवारांची लेखी चाचणी  घेण्यात येते .       शारीरिक चाचणीचे स्वरूप -                चाचणी स्वरूप                     गुण              1) गोळाफेक                         20              2) 100 मीटर धावणे        ...

12 वी नंतर करा हे डिप्लोमा 100%मिळेल सरकारी जॉब

 12 वी नंतर करा हे डिप्लोमा 100% मिळेल सरकारी जॉब.   सरकारी जॉबसाठी महत्वाचे कोर्सेस     12 वि नंतर सरकारी जॉब साठी महत्वाचे  DIPLOMA COURSE  असून ज्यामु ळे सरकारी जॉब साठी  उपयुक्त आहेत .                              1) NURSING DIPLOMA           12 वि नंतर लगेच 2 वर्षांचा NURSING DIPLOMA  करता येतो .त्यानंतर लगेच सरकारी जॉब तसेच PRIVATE   जॉब सहज उपलब्ध होतात. 2) DMLT        DMLT  हा एक lab टेक्निशियन चा डिप्लोमा असून याचाही कालावधी केवळ 2 वर्षांचा असतो.डिप्लोमा झाल्यानंतर लगेच जॉब मिळतो. सरकारी तसेच खाजगी जॉब सहज मिळतो . 3) X -RE  टेक्निशियन      12 वि नंतर 1 वर्षांचा डिप्लोमा असतो .त्यानंतर लगेच जॉब मिळु शकतो. 4) डिप्लोमा इन फार्मसी       12 वि सायन्स नंतर 2 वर्षांचा डिप्लोमा असतो .हा डिप्लोमा पूर्ण झाल्यानंतर लगेच खाजगी तसेच सरकारी जॉब मिळू शकतो .तसेच खाजगी...

पृथ्वी सूर्याभोवती व स्वतः भोवती फिरते तर मग आपण खाली का पडत किंवा आपल्याला जाणवत का नाही ?

 पृथ्वी सूर्याभोवती व स्वतः भोवती फिरते तर मग आपण खाली का पडत किंवा आपल्याला जाणवत का नाही ?      पृथ्वी स्वतः भोवती फिरत फिरत सूर्याभोवती फ़िरत असते . पृथ्वी ही पश्चिम दिशेकडून पूर्व दिशेकडे स्वतः भोवती फिरते .या गतीस परिवलन असे म्हणतात. याचा कालावधी 24 तासाचा असतो.तर पृथ्वी स्वतः भोवती फिरत सुर्यभोवती फिरत असते या गतीस परिभ्रमण असे म्हणतात याचा कालावधी हा 365 दिवसांचा असतो.          पृथ्वी परिभ्रमण व परिवलन करत असते तर आपल्या ला का जाणवत नाही याचे कारण म्हणजे पृथ्वी ची घनता खूप मोठी आहे .तसेच पृथ्वी फिरत असताना खालच्या बाजुला असणारे माणसे खाली का पडत नाही कारण पृथ्वीला असणारी गुरुत्वाकर्षण शक्ती खुप मोठी असते त्यामुळे पृथ्वीचा विशिष्ट अंतरापर्यंत वस्तू पृथ्वी कडेच खेचली जाते. म्हणून पृथ्वी खालच्या दिशेने फिरत असताना त्या भागातील वस्तू खाली पडत नाही