Skip to main content

Posts

Showing posts from April, 2021

आज मुख्यमंत्री यांनी केलेल्या संबोधनाचे काही ठळक मुद्दे .

 आज मुख्यमंत्री यांनी केलेल्या संबोधनाचे काही ठळक मुद्दे .    आज दि 30 मे 2021 रोजी मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला संबोधित केले .यामधील काही ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत . लॉकडाउन हे 15 मे पर्यंत वाढवले असून त्यात काही कडक निर्बंध लावण्याची आवश्यकता नाही . पुढील दोन महिने शिवभोजन थाळी ही मोफत करण्यात आली आहे . गरीब लाभार्थीना पुढील दोन महिने मोफत राशन देण्यात येणार आहे . पुढील काळात 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात येणार असून त्यासाठी ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे . श्रावणबाळ योजना ,तसेच संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभार्थीना दोन महिन्याची रक्कम याच महिन्यात मिळणार आहे . लग्न समारंभासाठी केवळ 25 जणांची मर्यादा लावण्यात आली आहे . रेमडेसीवीर इंजेक्शनची आवश्यकता नसल्यास वापर करू नये .

लॉकडाउन 15 मे पर्यंत कायम असून,काही निर्बंध शिथिल करण्यात येईल .

 लॉकडाउन 15 मे पर्यंत कायम असून,काही निर्बंध शिथिल करण्यात येईल .    सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या जरी घटली असली तरी ,कोरोनामुळे रुग्णाचे मृत्यूचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहेत .त्यामुळेच महाराष्ट्र राज्याने लॉकडाउन 15 मे पर्यंत कायम करण्याचे निर्णय घेण्यात आला आहे .यावर सर्व मंत्रिमंडळ बैठकीत सार्वमताने यावर निर्णय घेण्यात आला आहे .   1 मे पासून वय वर्ष 18 ते 44 वयोगटातील नागरिकांचे सरसकट लसीकरण करण्यात येणार आहेत .लसीकरण करण्यासाठी ऑनलाइन संकेतस्थळ वर नोंदणी करावी लागणार आहे .   निर्बंध हे कायम असणार असून काही बाबतीत निर्बंध शिथिल करण्याचा विचार अद्याप केलेला नसून काही बाबतीत निर्बंध शिथिल करण्यात येणार आहेत .   ग्रामीण भागात वयोवृद्ध नागरिक लसीकरण करण्यासाठी प्रतिसाद देत नसल्याचे निदर्शनास आले असल्याने त्यांनी लसीकरण करून घ्यावे असे आव्हान सरकारकडून करण्यात येत आहेत .

महाराष्ट्र ग्रामीण पोस्ट सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या 2428 जागेसाठी मोठी भरती.

 महाराष्ट्र ग्रामीण पोस्ट सर्कल मध्ये ग्रामीण डाक सेवक पदांच्या 2428 जागेसाठी मोठी भरती.    महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक पदांसाठी भरती प्रक्रिया चालू झाली असून कोरोना काळातही सुशिक्षित बेरोजगारांना भरती प्रक्रिया काढून काहीसा दिलासा केंद्र सरकारने दिला आहे .शिवाय टपाल खात्यातील डाक सेवक हे कोरोना काळामध्ये आपली भूमिका मोठ्या काळजीपूर्वक निभावत आहे .ह्या पदासाठी भरती प्रक्रिया राबविणे आवश्यक असल्याने केंद्र सरकारने 2448 पदसंख्येसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - ग्रामीण डाक सेवक यामध्ये 3 पद येतात - 1) शाखा पोस्टमास्टर 2 ) सहाय्यक शाखा पोस्टमास्टर 3) डाक सेवक . पद संख्या - 2428 पात्रता -  1)मान्यताप्राप्त बोर्डातून 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2) MSCIT कोर्स उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा - 18 ते 40 . वेतन - 10000 /- ते 14500 /- कामाच्या तासानुसार वेतनमान ठरवलेले आहेत . भरती प्रक्रिया -   भरती प्रक्रिया ही नेहमी प्रमाणे 10 वि च्या गुणवत्तेनुसार निवड करण्यात येईल...

मोबाईल चा विमा (Insurance) कसा काढायचा.

 मोबाईल चा विमा (Insurance) कसा काढायचा.        आजकाल प्रत्येक गोष्टीचा विमा काढता येतो .आयुष्याचा जीवन विमा ,तसेच जनावरांसाठीचा विमा शिवाय काही अभिनेत्रीनी आपल्या सुंदरतेची विमा काढला आहे .आपण मोबाईलचा विमा कसा काढायचा ते पाहणार आहोत .  मोबाइल विमा कसा काढायचे फायदे - मोबाईल  खराब झाल्यानंतर दुरुस्ती साठी येणारा PLAN नुसार खर्च मिळेल . मोबाईलची स्क्रीन ,हँग झाल्यास येणारा खर्च मिळेल . मोबाइल दुरुस्ती खर्च मिळेल . 71% मोबाईल दुरुस्ती खर्च मिळेल . विमा प्रीमियम PLAN -   विमा प्रीमियम 599 /- पासून सुरू होते . विमा कसा काढायचा -    आपल्या संबंधित नोंदणीकृत मोबाइल कार्यालयात विमा काढता येईल .शिवाय ऑनलाइन पद्धतीने PAYTM APPS वरी ,ऑनलाइन मोबाईल विमा काढता येतो .

LIC AGENT होऊन कमवा लाखो रुपये .

 LIC AGENT होऊन कमवा लाखो रुपये .    आपल्याला माहीतच आहे आपल्या देशामध्ये विम्याला किती जास्त प्रमाणात महत्त्व दिले जाते .भारतीय  जीवन विमा ही एक सरकारी विमा कंपनी असल्याने या कंपनीवर लोकांचा विश्वास मोठ्या प्रमाणात आहे .भारतीय लोकांची मानसिक ही आपल्या मृत्यूनंतर आपल्या परिवाराचे कसे यासाठी भारतीय लोक जास्त प्रमाणात विमा काढून घेतात .विमा हे विमा प्रतिनिधी मार्फत काढला जातो हे आपल्याला माहीतच आहे .परंतु आपल्याला त्यांना मिळणारे कमिशन किती असते हे आपल्याला माहिती नसते .विमा प्रतिनिधीचे कमिशन खूप जास्त असते .   याचा फायदा घेऊन विमा प्रतिनिधी म्हणूनच स्वतःचा प्रोफेशनल व्यवसाय आपण सुरु करू शकतो .शिवाय यामध्ये कोणतेही मोठे भांडवल नसून केवळ लोकांना पटवुन लोकांचे विमा काढून देणे .तसेच विमा प्रिमियम भरणे असा स्वतःचा प्रोफेशनल व्यवसाय करू शकता . पात्रता -  10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विमा पॉलिसी पटवून सांगण्याचे कौशल्य असणे आवश्यक आहे. विमा प्रतिनिधी ID कशी मिळवावी .   LIC विमा प्रतिनिधी होण्यासाठी तुम्हाला जवळच्या LIC कार्यालयास भेट द्यावी लागेल  .मॅन...

आज रात्रीपासून जिल्हाबंदी वआंतरराज्य बंदी ,प्रवासासाठी लागेल पास.

 आज रात्रीपासून जिल्हाबंदी वआंतरराज्य बंदी ,प्रवासासाठी लागेल पास.    सध्या कोरोनामुळे मृत्यू प्रमाण मोठया प्रमाणात वाढले असून ,शिवाय रुग्णांना बेडच उपलब्ध होत नाहीत त्यामुळे कोरोना रुग्ण दगावण्याची संख्या वाढत आहे .त्यामुळे हा कोरोनाचा पादुर्भाव कमी करण्यासाठी राज्यात अनेक निर्बंध लावण्यात आले आहेत .तरीही काही नागरिक विनाकारण रस्त्यावर फिरत आहेत ,त्यामुळेच राज्यात आज रात्री 8 पासून राज्यात जिल्हाबंदी करण्यात आली आहे .तसेच आंतरराज्य बंदी करण्यात आली आहे .यामध्ये दुसऱ्या जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी आता पासची आवश्यक लागणार आहे तेही अत्यावश्यक काम असल्यासच प्रवास करता येणार आहे .यामध्ये केवळ अत्यावश्यक कामकाज जसे रुग्णांना व त्यासोबत एका नातेवाईकास तसेच सरकारी कर्मचारी यांनाच प्रवास करता येईल पास आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये मिळेल किंवा ऑनलाइन पोलीस संकेतस्थळावरून अर्ज करून मिळवता येईल .   खाजगी बसेस मध्ये प्रवास करताना केवळ 50% प्रवाशांना प्रवास करता येईल तेही अत्यावश्यक कामकाज असल्यास प्रवास करता येईल.

नाशिक महानगरपालिका मध्ये ऑक्सिजन गळती मुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू .

 नाशिक महानगरपालिका मध्ये ऑक्सिजन गळती मुळे तब्बल 22 जणांचा मृत्यू .    नाशिक महानगरपालिका मध्ये ऑक्सिजन पुरवठा गळती मुळे तब्बल 22 कोरोना रुग्णाचा आज दुपारी मृत्यू झाला आहे .याबाबत सर्व स्तरावरून हळहळ व्यक्त करत आहे .या घटणेसाठी स्थानिक प्रशासन जबाबदार असल्याने सर्व स्तरावरून यावर टिका होत आहेत .   ऑक्सिजनचा पुरवठा खंडित झाल्याने अनेक रुग्ण ऑक्सिजन अभावी मृत्यू मुखी पडले .यासाठी सर्व बाजूंनी स्थानिक प्रशासनास जबाबदार धरले असून केंद्र स्तरावरून याबाबत हळहळ व्यक्त केली आहे. परत असे अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासनास सक्त ताकीत देण्यात आले आहे .शिवाय महाराष्ट्र राज्यामध्ये ऑक्सिजन बेडची अपुरी पडणारी संख्या लक्षात घेता केंद्राने याकडे लक्ष देऊन महाराष्ट्र राज्यास ऑक्सिजन पुरवठा वाढवावा अशी आशा व्यक्त केली आहे .   रुग्णाला ऑक्सिजन बेडसाठी वेटिंग करावी लागत असल्याने रुग्णांच्या नातेवाईक कडून तीव्र नाराजी व्यक्त करत आहेत .

संपूर्ण देशात लॉकडाउन करण्याचा केंद्र शासनाचा विचार.

 संपूर्ण देशात लॉकडाउन करण्याचा केंद्र  शासनाचा विचार.     महाराष्ट्र सरकार 30 एप्रिल 2021 पर्यंत काही नियम अटी कठोर करून लॉकडाऊन करण्यात आले आहे .कोरोनाचा संसर्ग कमी व्हावा यासाठी हे लॉकडाऊन करण्यात आले आहे ,परंतु कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत .व मृत्यूदर प्रमाणही वाढत आहेत .पश्चिम बंगालमध्ये निवडणूक चालू असल्याने मोठ्या प्रमाणात गर्दी वाढत आहेत त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे निर्बंध राज्य सरकारने लावले नसल्याने तेथे कोरोनाचे रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहेत .त्याचबरोबर दिल्ली मध्ये काही निर्बंध असूनही रुग्ण संख्या वाढतच आहेत .यातायात चालूच असल्याने रुग्ण संख्या वाढतच आहेत .     लसीकरण चालू असून लसीचा कमी पडत आहे .तरुण वर्गातील मृत्यू दरही वाढत आहे .त्यामुळेच केंद्र सरकारने 10 बोर्ड परीक्षा रद्द केले आहे .त्याच धर्तीवर महाराष्ट्र शासनाने दहावी बोर्ड परीक्षा सुद्धा रद्द करण्यात आले आहे .    त्याचमुळे देशात लॉकडाउन करण्याचे संकेत देण्यात आले आहेत .म्हणून सर्व जण घरातच रहा सुरक्षित रहा .

महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा सर्वमताने रद्द करण्याचा सर्वात मोठा निर्णय.

 महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा सार्वमताने रद्द करण्याचा सर्वात मोठा निर्णय.   महाराष्ट्र राज्य सरकारने दहावी बोर्ड परीक्षा   रद्द करण्याचा सर्वात मोठा निर्णय घेण्यात आला आहे .याचे मुख्य कारण माझा सध्या महाराष्ट्र मध्ये कोरोनाचा पादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असून कोरोनामुळे मृत्यूचे प्रमाणही वाढले आहे .त्याचबरोबर केंद्र सरकारने अगोदरच CBSE  दहावी बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत .केंद्र सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने आज मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सार्वमताने घेण्यात आला आहे .    यामुळे विद्यार्थ्यांमध्ये परीक्षा बाबत होणारा संभ्रम दूर झाला आहे .काही विद्यार्थी व पालकांना परीक्षा व्हावी असे वाटत होते ,परंतु कोरोनाचा कहर लक्षात घेता ,व विद्यार्थी व जनतेच्या आरोग्याचा विचार करता परीक्षा रद्द करणे हाच पर्याय महाराष्ट्र सरकार कडे उरल्याने ,अखेर महाराष्ट्र सरकारने दहावी बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आली .     लॉकडाउन  अधिक कडक करण्याचे संकेतही देण्यात आले आहे .मा .मुख्यमंत्री यांनी लॉकडाउनचे न...

5 वि ते 10 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विजाभज /विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना .

5 वि ते 10 पर्यंत शिक्षण घेणाऱ्या विजाभज /विमाप्र प्रवर्गातील गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती योजना .    समाजकल्याण विभागामार्फत माध्यमिक शिक्षण घेणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते .ही योजना केवळ विजाभज / विमाप्र याच प्रवर्गासाठी आहे . प्रमुख अटी -  वरी नमूद केल्याप्रमाणे विद्यार्थी हा विजाभज / विमाप्र या प्रवर्गातील असावा . मागील वर्गाच्या वार्षिक परीक्षेत वर्गामध्ये प्रथम / द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले असावे . विद्यार्थी हा मागील वर्षी त्याच शाळेत शिक्षण घेत असावा किंवा तो ज्या शाळेत शिक्षण घेत होता त्याठिकाणचे प्रथम/द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेले गुणपत्रिका . आर्थिक लाभाचे स्वरूप - 5 वि ते 7 वि पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत प्रथम /द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महा ₹20 दिले जाते असे ऐकून 10 महिन्यासाठी 200 रुपये शिष्यवृत्ती दिली जाते . 8 वि ते 10 वि पर्यंत शिक्षण घेणाऱ्या गुणवंत प्रथम /द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रति महा ₹ 40 दिले जाते असे ऐकून 10 महिन्यासाठी 400 रुपये शिष्यवृत्ती दिल...

डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवन प्रकाश योजनाची सुरुवात .

 डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर  जिवन प्रकाश योजनाची सुरुवात .   योजनेचे नाव - 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर जिवन प्रकाश योजना".  मंत्रालय विभाग - ऊर्जा ,उद्योग व कामगार विभाग . योजनेचे उद्दिष्ट -  डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी गरीब परिस्थिती मधून आपले शिक्षण पूर्ण केले व मिळवलेल्या ज्ञानाचा वापर त्यांनी मागासवर्गीय ,वंचित, गरीब जनतेला प्रकाशाच्या दिशेने नेण्याचे कार्य केले आहे .त्यामुळे त्यांच्या या जयंतीनिमित्त ही योजना सुरू करण्यात आली आहे. डॉ .बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त ज्यांच्या घरी  वैयक्तिक विजजोडणी केलेली नाही अशा पात्र कुटुंबाना वैयक्तिक वीज जोडणी  करण्यासाठी विशेष योजना . पात्रता - लाभ घेणारा लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे . लाभार्थी हा अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती मधील असावा . या अगोदर लाभार्थीच्या नावे कोणतेही थकीत वीज बिल असू नये . या अगोदर लाभार्थीच्या नावे वीज जोडणी असू नये. योजनेचा कालावधी - ही योजना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीपासून म्हणजे 14 एप्रिल 2021 पासून ते दि .06 डिसेंबर 20...

आता फक्त याच खाजगी वाहनांना करता येणार प्रवास

 आता फक्त याच खाजगी वाहनांना करता येणार प्रवास.       महाराष्ट्र मध्ये सध्या दि .30 एप्रिल 2021 पर्यंत लॉकडाउन आहे ,परंतु सध्या मोठ्या प्रमाणात नागरिक गर्दी करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढेल याची भीती वाढू लागली असल्याने मुंबई  शहरांमध्ये आता पोलिस प्रशासन मार्फत नवीन नवीन लागू करण्यात आले आहे .यामध्ये केवळ अत्यावश्यक कर्मचारी प्रवास करू शकतील .विनाकारण फिरण्याऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल .खाजगी वाहनांवर आता कलर कोड पद्धत चालू करण्यात आली आहे .यामध्ये जे कर्मचारी अत्यावश्यक सेवेसाठी आहेत त्यांनाच प्रवास करण्याची मुभा आहे .व त्यांच्या खाजगी वाहनावर कलर कोड लावण्यात येईल .  कलर कोड हे तीन प्रकारचे असून यामध्ये लाल,हिरवा,पिवळा असे तीन कलर कोड ठेवण्यात आले आहेत . लाल - आरोग्य कर्मचारी च्या खाजगी वाहनांसाठी लाल कलर कोड . पिवळा - अत्यावश्यक सेवेतील कर्मचारीच्या खाजगी वाहनांवर पिवळा कलर कोड . हिरवा - भाजीपाला, फळे विक्रेते यांच्या खाजगी वाहनांवर हिरवा कलर कोड. खाजगी वाहनांवर लाल ,हिरवा,पिवळा कलर कोड असणाऱ्या खाजगी वाहनांनाच प्रवास करत...

कोतवाल भरती ,वेतन व पदोन्नती संपूर्ण माहिती.

  कोतवाल भरती ,वेतन व पदोन्नती संपूर्ण माहिती.    कोतवाल हे पद महसूल खात्यातील सर्वात खालचे पद असून ,काही काळ हे पद जिल्हा परिषद विभागाकडे वर्ग करण्यात आले होते .व परत हे पद महसूल विभागाकडे वर्ग करण्यात आले .हे पद अगोदर आनुवंशिक रित्या भरण्यात येत होते 1963 पासून हे आनुवंशिक पद भरती रद्द करून हे पद महसूल खात्यामार्फत भरण्यात येते .सन 1963 पर्यंत हे पद गावसेवक / कनिष्ठ ग्रामसेवक या नावाने ओळखले जात होते . पात्रता - 4 थी पास असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 18 व कमाल 40 दरम्यान असणे आवश्यक आहे. MSCIT  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. मानधन -     मासिक मानधन रुपये 5000 /- प्रतिमहा दिले जाते .तसेच शासकीय कर्मचारी प्रमाणे सुट्टी ,सेवानिवृत्त फायदे या पदास लागू आहेत . कामकाज - रात्रीच्या वेळेस पोलीस पाटीलास गस्त घालण्यासाठी मदत करणे . ग्रामसेवकास विवाह नोंदणी ,जन्म नोंदणी करण्यात मदत करणे . गावात दवंडी देणे . तलाठी ला कार्यालयीन वेळात मदत करणे . शेतसारा भरणे ,शुल्क जमा करणे ग्रामपंचायत पातळीवर असणाऱ्या शासकीय संपत्तीवर देखरेख ठेवणे . सरपंच, ग्रामसेवकास ,व तलाठीस प्रशास...

पोलीस पाटील पद भरती , मानधन संपूर्ण माहिती .

 पोलीस पाटील पद भरती , मानधन संपूर्ण माहिती .     प्राचीन काळामध्ये पोलीस पाटील हे प्रशाकीय अधिकारी म्हणून गावातील शांतता व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी काम करीत असत .व गावातील भांडणे ,तक्रारी गावातच मिटवली जात असत .शिवाय पोलिस पाटील हे पद खूप मानाचे पद समजले जात असत .काही काळानंतर हे पद केवळ गावपूरतेच शिल्लक राहिले होते .शिवाय हे पद वारस स्वरूपानुसार पोलीस पाटील त्याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलास हे पद भेटायचे .काळानुसार हे पोलीस पाटील यांना मिळणारे मानधन कमी स्वरूपात व वारसा हक्कनुसार मिळत असल्याने या पदाचे महत्त्व खूपच कमी झाले होते .त्यामुळे राज्य सरकारने हे पद आता स्पर्धा परीक्षा घेऊन हे पद भरले जात आहेत ,तसेच मानधन मध्ये वाढ करण्यात आली आहे. पदासाठी आवश्यक पात्रता - उमेदवार हा ज्या गावात जागा रिक्त आहेत त्या पोलिस प्रशासनातील स्थानिक असणे आवश्यक आहे. उमेदवार हा SSC  बोर्ड परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. उमेदवार हा शारीरिक दृष्टीने सदृढ असणे आवश्यक आहे. दोन पेक्षा जास्त हयात मुले असू नये . उमेदवार हा इतर कोणतीही शासकीय/ निमशासकीय नौकरी करत नसावा . उमेदवारचे किम...

महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन मध्ये पुणे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन मध्ये पुणे विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .    महाराष्ट्र मेट्रो रेल्वे कार्पोरेशन , पुणे हा भारत सरकार व महाराष्ट्र सरकार यांचा संयुक्त उपक्रम आहे .या कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांसाठी पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशील खालीलप्रमाणे आहे. 1) उपमहाव्यवस्थापक (deputy general manager ) -   पदांची संख्या - 02   शैक्षणिक पात्रता - CA /ICWA   वाणिज्य शाखेतील परीक्षा उत्तीर्ण .   वेतन - 70000 - 200000/- 2)कनिष्ठ अभियंता (Jr. engineer)     पदांची संख्या - 04     शैक्षणिक पात्रता - 4 वर्षाची इंजिनिअरिंग पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.     वेतन - 33,000 ते 100000 /- 3)खाता सहाय्यक (account assistant )     पदांची संख्या - 05     शैक्षणिक पात्रता - B.com  पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.     वेतन - 25000 ते 80000 /-  अर्ज करण्याची शेवटची दिनांक -15 /05 /2021 सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

आशा स्वयंसेविका पद भरती ,मानधन माहिती .

 आशा स्वयंसेविका पद भरती ,मानधन माहिती .       ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रामधील महत्वाचे कार्य करणारे महिला कर्मचारी म्हणजे आशा स्वयंसेविका होय .हे पद प्रथम प्रामुख्याने आदिवासी भागात बालमृत्यू दर कमी करण्यासाठी हे पद मंजूर केले होते .परंतु या पदांची गरज सर्वच भागात असल्याचे दिसून आल्याने महाराष्ट्र सरकारने आता सर्व भागात हे पद मंजूर केले आहे .व हे पद प्राथमिक आरोग्य केंद्राशी निगडित असते .परंतु हे पद ग्रामपंचायत पातळीवर कार्यरत असते .ग्रामपंचायत लोकसंख्या नुसार आशा स्वयंसेविका पदांची संख्या ठरविली जाते साधारणपणे 1000 ते 1500 लोकसंख्या मागे 1 स्वयंसेविका पद मंजूर आहे . पदासाठी पात्रता - या पदासाठी उमेदवार ही महिला असणे आवश्यक आहे. उमेदवार ही त्या गावातील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे. उमेदवार ही त्या गावातील विवाहित महिला असणे आवश्यक आहे. उमेदवार ही 10 वि  उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 25 ते कमाल 40 वर्ष असणे आवश्यक आहे. विधवा, आदिवासी, स्वयंसेविका संस्था यांना प्राधान्य देण्यात येईल. निवड प्रक्रिया -    उपलब्ध जागेनूसार ग्रामसेवकांने...

वाहतूक सुविधा व इतर कडक निर्बंध लादण्याचे संकेत .

  वाहतूक सुविधा व इतर कडक निर्बंध लादण्याचे संकेत .   सध्या महाराष्ट्र मध्ये दि .30 एप्रिल 2021 पर्यंत लॉक डाउन असून केवळ काही निर्बंध लागू करण्यात आले आहेत .या लॉक डाउन मध्ये जीवनावश्यक गोष्टी तसेच शेतीविषयक कामे इतर काही कामावर कोणतेच निर्बंध लागू नाही .परंतु सध्या नागरिक या लॉक डाउन चे नियम काटेकोरपणे पाळत नसल्याने हे निर्बंध अधिक कडक करण्याचे संकेत देण्यात आले आहेत .जसे की सार्वजनिक वाहतूक सेवा ही अत्यावश्यक सेवा साठी वापर करण्यात यावी असे सांगितले होते परंतु तसे नागरिक करत नसल्याचे दिसून येत आहे .यामुळे महाराष्ट्र शासनाने याबाबत कडक भूमिका घेण्याचे संकेत देण्यात आले आहे .तसेच मुंबई मध्ये लोकल सेवा केवळ अत्यावश्यक सेवांसाठी वापर करावी ,तसेच अत्यावश्यक सेवा देण्याऱ्या कर्मचारी लोकलचा वापर करावा असे निर्देश देण्यात आले होते .परंतु तसे होत नसल्याचे दिसून येत आहे .यामध्ये नागरिक सारखे गर्दी होत असल्याचे दिसून येत असल्याने याबाबत कडक भूमिका घेऊ असेही मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केले आहे .त्याचबरोबर अत्यावश्यक दुकाने ,फळे हे सुध्दा बंद करण्याचे संकेत दिले आहे .त्यामुळे नागरिक लॉक ड...

आज लॉकडाउन मध्ये मध्ये झालेले काही बदल .

  आज लॉकडाउन मध्ये मध्ये झालेले काही बदल . मुख्यमंत्री यांनी लॉक डाउन संबंधित काही कठोर निर्बंध केले होते परंतु त्याची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून आल्याने आज सरकारने कठोर निर्बंध घातले आहेत .काही भागात तर राज्य सुरक्षा बलाला पाचारण केले आहे . तसेच मुख्यमंत्री यांनी नमूद केल्याप्रमाणे खाजगी वाहने अत्यावश्यक असल्यासच बाहेर पडावे असे सांगण्यात आले होते परंतु ही गर्दी काही कमी होत नसल्याने राज्य सरकारने खाजगी वाहनांना अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचारी वगळून इतर खाजगी वाहनांना पेट्रोल ,डिझेल न देण्याचे ठरवले आहे. तसेच आता खाजगी वाहनांना आता ओळखपत्र सोबत बाळगणे सक्तीचे केले आहे .अत्यावश्यक गरजांसाठीच बाहेर पडावे अन्यथा बाहेर पडू नये असेही नागरिकांना आव्हान केले आहे.

वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी येथे शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी पदांसाठी भरती प्रक्रिया .

 वन वैभव शिक्षण मंडळ, अहेरी येथे शिक्षक व शिक्षेत्तर कर्मचारी पदांसाठी भरती प्रक्रिया .     वन वैभव शिक्षण मंडळ ,अहेरी जिल्हा गडचिरोली येथे शिक्षक व शिक्षेत्तर पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून ,शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . 1) माध्यमिक शिक्षक - पदांची संख्या =05    शैक्षणिक पात्रता =बि .एड व संबंधित विषयासह उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. 2)निदेशक - पदांची संख्या =01   शैक्षणिक पात्रता =B.sc agree. 3)कनिष्ठ लिपिक -पदांची संख्या =02 कोणतेही पदवी मराठी 30 व इंग्रजी 30&40 टायपिंग उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रयोगशाळा सहाय्यक - पदांची संख्या =02 शैक्षणिक पात्रता =12 वि विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. शिपाई -पदांची संख्या =03 शैक्षणिक पात्रता =9 वि पास असणे आवश्यक आहे. हे सर्व पदे 100% अनुदानावरील पदे आहेत .निवड प्रक्रिया मुलाखत घेऊन घेण्यात येणार असून दि.19 एप्रिल 2021 रोजी वेळेत उपस्थित राहणे . सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा  CLICK HERE

अचानक दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे ?

 अचानक दोन हजार रुपयांच्या नोटा गेल्या कुठे ?     मोदी सरकारने देशामध्ये होणार मोठा भ्रष्टाचार ,काळाबाजार ,बनावट नोटा यावर मात करण्यासाठी मोदी सरकारने अचानक नोट बंदीची घोषणा केली .यामध्ये देशात चलनात असणाऱ्या 500 रुपये व 1000 रुपयांच्या नोटा चलनातून काढून टाकल्या यामुळे देशातील जनतेला मोठा त्रास सहन करावा लागला .भ्रष्टाचार कमी झाला परंतु मोदी सरकारने जे प्रचलित असणाऱ्या 500 व 1000 रुपयांच्या नोटा रद्द केल्या परंतु त्याबदल्यात 2000 रुपयांची नोट चलनात आणली परंतु या नोटा खूप मोठे दुष्परिणाम होते त्यामुळे सरकारने दोन हजार रुपयांच्या नोटा हळूहळू अर्थव्यवस्था मधून काढून घेतले आहे . या  नोटांचे प्रमुख अयोग्य बाबी /दुष्परिणाम  - लहान आर्थिक व्यवहार करण्यास अडचण निर्माण होत होती. दोन हजारांची नोट तयार करण्यासाठी भारतीय बनावटीचा कागत वापरण्यात आला आहे. हा कागत अत्यंत चांगला आहे परंतु या नोटांचा कलर पाण्यात भिजल्यास कलर निघून जायचा . ही नोट सहज समजण्यास अडचणी निर्माण होत होती त्यामुळे सुरुवातीला भरपूर बनावटीच्या नोटा बाजारात आल्या यामुळे मोठा भ्रष्टाचार झाला . अर्थशास्त्रच...

तालुका आरोग्य कार्यालय ,पंचायत समिती धुळे येथे वॉर्ड बॉय पदांच्या 10 जागेसाठी भरती प्रक्रिया .

 तालुका आरोग्य कार्यालय ,पंचायत समिती धुळे येथे वॉर्ड बॉय पदांच्या 10 जागेसाठी भरती प्रक्रिया .    तालुका आरोग्य कार्यालय ,पंचायत समिती धुळे येथे वॉर्ड बॉय पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून  पात्र शैक्षणिक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे .सदर पद भरती ही रोजंदारी पद्धतीने भरण्यात येणार आहे .तसेच निवड झालेल्या उमेदवारांना कोविड सेंटर मध्ये काम करावे लागणार आहे .पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे . पदाचे नाव - वॉर्ड बॉय (ward boy) पदांची संख्या - 10  शैक्षणिक पात्रता - उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेतन /मानधन - प्रति दिन - 400/-  निवड प्रक्रिया - थेट मुलाखत घेऊन निवड केली जाईल . मुलाखत दिनांक - दि -16/04/2021  मुलाखत ठिकाण - पंचायत समिती ,धुळे तालुका जिल्हा धुळे . सविस्तर अधिकृत जाहिरात पाहा    CLICK HERE

लॉक डाउनचे नवे नियम व निर्बंध/काय चालू व काय बंद असेल.

 लॉक डाउनचे नवे नियम व निर्बंध/काय चालू व काय बंद असेल.    आज दिनांक 13 एप्रिल 2021 रोजी मा .ना.मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला फेसबुक लाईव्ह च्या माध्यमातून बोलताना त्यांनी काही निर्बंध घातले आहेत .निर्बंध पुढीलप्रमाणे आहे . 1) उद्या दि 14 एप्रिल 2021 रोजी रात्री 8 वाजल्यापासून राज्यात कलम 144 लागू करण्यात आले आहे .म्हणजे उद्यापासून राज्यात संचारबंदी लागू होणार आहे . 2)अनावश्यक रस्त्यावर फिरणे बंद होईल . 3)अत्यावश्यक आस्थापना वगळून इतर सर्व आस्थापना बंद असतील . 4)हॉटेल, बार ,रेस्टॉरंट बंद असतील . 5)खाजगी कोचिंग बंद असतील . काय चालू राहील - 1) सार्वजनिक वाहतूक सेवा, मेट्रो ,बस विमान वाहतूक चालू राहतील . 2)मेडिकल, किराणा दुकान अत्यावश्यक सुविधा चालू असतील. 3)उद्योग ,वाणिज्य शाखा चालू राहतील . गरिबांना मिळणारे लाभ - 1) आदिवासी बांधवाना खावटी योजनेअंतर्गत 2000 /- मिळणार. 2)संजय गांधी निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांना अगोदरच 1000 /- रुपये मिळतील. 3)रिक्षाचालक यांना 1500/- रुपये मिळणार. 4)नोंदणीकृत बांधकाम कर्मचारी, फेरीवाले यांना 1000/- मिळतील.

सरळसेवेच्या स्पर्धा परीक्षा ह्या ऑगस्ट /सप्टेंबर या महिन्यातच का होतात वाचा सविस्तर

सरळसेवेच्या स्पर्धा परीक्षा ह्या ऑगस्ट /सप्टेंबर या महिन्यातच का होतात वाचा सविस्तर   महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक वेळा सरळसेवेच्या परीक्षा ह्या ऑगस्ट/सप्टेंबरमध्ये होतात याचे काही कारणे आहेत .ते खालीलप्रमाणे सांगता येतील .प्रामुख्याने महाराष्ट्र राज्यामध्ये विविध विभागाच्या वर्ग 3,वर्ग -4 या पदांसाठी सरळसेवेच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात येते .ही परीक्षा जुलै महिन्यानंतरच घेण्यात येते या पदांसाठीचे जाहिरात ऑगस्ट/सप्टेंबर या महिन्यातच जास्त करून निघतात .याचे मुख्य कारण म्हणजे शासकीय कर्मचारीची होणारी आंतरजिल्हा बदली यानुसार रिक्त पदांचा अहवाल सादर करावा लागतो .शासकीय कर्मचारीची ही बदली माहिती मे/जून या महिन्यात होतात .त्यामुळे रिक्त पदांचा अहवाल तयार असतो व यानुसारच रिक्त पदांवर भरती प्रक्रिया राबविण्यात येते .जेणेकरून शासकीय कर्मचाऱ्यांना त्यांच्या बदलीनंतर रिक्त मंजूर पदांवरच भरती प्रक्रिया राबविण्यात येते .म्हणून शासकीय कर्मचारी यांची बदली प्रक्रिया झाल्यानंतरच सरळसेवेच्या अंतर्गत येणाऱ्या स्पर्धा परीक्षा साठी आयोजन ऑगस्ट/सप्टेंबर या महिन्यात केले जाते .तर राज्यसेवा व दुय्यम अरा...

लॉकडाउन 100% होणार सर्व बाजूंनी केला जातोय विचार .

 लॉकडाउन 100% होणार सर्व बाजूंनी केला जातोय विचार .        महाराष्ट्र मध्ये कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत असून त्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही वाढत आहेत .त्यामुळेच महाराष्ट्र मध्ये आता 100 % होणार लॉकडाउन .याबाबत फ़क्त मुख्यमंत्री जाहीर करायचे बाकी आहेत परंतु लॉक डाउन नंतर येणारे सर्व बाजूंचा विचार केला जात आहेत. जसे महाराष्ट्र मधील मध्यम व गरीब ,दारिद्र्य रेषेखालील वर्गांचा विचार करणे गरजेचे आहे .व त्याचीच चाचपणी चालू आहे.यामध्ये प्रामुख्याने गरीब ,मध्यमवर्गीय लोकांसाठी विशेष पॅकेज ची घोषणा केली जाणार आहे . जसे विरोधी पक्षाच्या वतीने गरीब व मध्यमवर्गीय लोकांसाठी सरसकट रुपये 5000/- द्यावेत ,असे विरोधी पक्षाच्या वतीने करीत आहेत .तसेच महाराष्ट्र मधील शेतकरी वर्गाचे सर्व कामकाज चालू असतील त्याचबरोबर वाहतूक ,सुविधांमध्ये प्रवासी वाहतूक ,माल वाहतूक चालू ठेवण्याचा विचार चालू आहे. त्याचबरोबर मजूर वर्गांसाठी विशेष पॅकेजची घोषणा केली जाणार आहे.हा लॉक डाउन साधारणपणे 8 ते 15 दिवसांचा असेल ,यामध्ये काही बाबींवर सूट देण्यात येणार आहेत .ते अद्याप जाहीर झाले नाहीत .तसेच या लॉक डाउन मध...

बारावीची परीक्षा माहे मे अखेरीस तर दहावीची परीक्षा जूनमध्ये होणार आताची मोठी बातमी.

 बारावीची परीक्षा माहे मे अखेरीस तर दहावीची परीक्षा जूनमध्ये होणार आताची मोठी बातमी.     आताच शिक्षण मंत्री मा. ना.श्रीम .वर्षा गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार दहावी व बारावीची परीक्षा पुढे ढकलल्या असून दहावीच्या परीक्षा माहे जून मध्ये तर बारावीच्या परीक्षेत माहे मे अखेरीस होणार आहेत .याबाबत सविस्तर माहिती शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली आहे .याचे मुख्य कारण म्हणजे सध्या वाढणार कोरोनाचा संसर्ग असून त्याचा संसर्ग कमी करण्यासाठी ही परीक्षा पुढे ढकलली आहे .तसेच विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले रहावे याचे विचार लक्षात घेऊन ही परीक्षा पुढे ढकलली आहे .याबाबत सविस्तर माहिती सर्व बोर्ड सेंटरला देण्यात आली असून तसे मुख्यमंत्री यांनी जाहीरही केले आहे.व काही दिवसात लॉक डाउन चाही इशारा देण्यात आला आहे.

जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना .

 जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागाची दुधाळ जनावरांचे गट वाटप योजना .       जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत दुधाळ जनावरांचे गट वाटप करण्यात येते. तसेच शेळीचे गट वाट ही करण्यात येते .या योजनेअंतर्गत लाभ घेतल्यानंतर जनावरे लगेच विकता येणार नसून त्याचे पालन पोषण करणे गरजेचे आहे. पालन पोषणास खाद्यही पुरवले जाते .या योजनेची अटी व शर्ते खालीलप्रमाणे आहेत . ज्या प्रवर्गासाठी आहे तो प्रवर्ग - लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौध्द असावा . इतर अटी व शर्ते - 1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)सदर लाभार्थी हा वरी नमुद केल्याप्रमाणे अनुसूचित जाती नवबौद्ध असावा . 3)लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यास दि.01/04/2021 नंतर 2 पेक्षा जास्त हयात मुले नसावेत . 4)लाभार्थीमध्ये 33% महिलांचा सहभाग असावा . 5)लाभार्थी हा दारिद्र्य रेषेखालील असल्यास प्राधान्य देण्यात येईल . लाभाचे स्वरूप -     या योजनेअंतर्गत गायी /म्हैस/संकरित गायी/संकरित म्हैस यापैकी आपल्याला पसंतीप्रमाणे दुधाळ जनावरे लाभास पात्र ठरतील .लाभ घेण्याऱ्यास दोन जनावरांची किंमत प्रत्येकी 40000/- प्र...

Refer & earn "Refer " करून कमवता येणारे रियल Apps .

 Refer & earn "Refer " करून कमवता येणारे रियल Apps .      आजकाल अनेक apps आहेत जे refer करून काही विशिष्ट रक्कम कमवा असे सांगितले जाते परंतु अनेक किंबहुना भरपूर apps हे फसवले जाते refer करूनही कमाई होत नाही .काही विशिष्ट apps आहेत ज्या apps ला refer केल्यानंतर विशिष्ट रक्कम आपल्याला प्राप्त होईल .यामध्ये apps हे refer विशिष्ट पद्धतीने करणे आवश्यक आहे ,जसे व्हाट्सएप,फेसबुक,sms लिंक ,ईमेल ,लिंक अशा माध्यमातून refer करणे गरजेचे आहे .जे apps refer केल्यानंतर कमाई होते असे apps खालीलप्रमाणे आहेत . 1) फोन -पे ( phonepe)    आजकाल सर्वात प्रचलित व लोकप्रिय असणारा हा बँकींग सुविधा साठीचा apps आहे .हा apps भारतीय बनावटीचा apps असून या apps च्या माध्यमातून आपण पैसे पाठवणे, ऑनलाइन पेमेंट करणे,ऑनलाइन बिल भरणे असे व्यवहार करू शकतो .हे apps अगोदरच आपल्याकडे असणे आवश्यक आहे. फोन पे apps मध्ये refer & earn असा एक ऑप्शन असतो त्यावर क्लिक करून लिंक share करून दुसऱ्याने त्या लिंक वरून फोन पे apps डाऊनलोड करून पहिला आर्थिक व्यवहार केल्यास आपल्या फोन पे wallet मध्ये refe...

जिल्हा परिषदेच्या " शेळी वाटप योजना "चे नवे नियम /अटी व शर्ते .

 जिल्हा परिषदेच्या " शेळी वाटप योजना "चे नवे नियम /अटी व शर्ते .   जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागामार्फत गरजूंना किंवा जे शेळी पालन व्यवसाय करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी शेळी वाटप योजना आहे .ही योजना राज्य शासनामार्फत राबविण्यात येते .या योजनेची अटी शर्ते खालीलप्रमाणे आहेत . ज्या प्रवर्गासाठी ही योजना लागू आहे असा प्रवर्ग -  लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध असावा . या योजनेची प्रमुख अटी - 1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)वरील प्रमाणे नमूद केल्याप्रमाणे लाभार्थी हा अनुसूचित जाती नवबौद्ध असावा . 3)दि 01 /05 /2001 नंतर दोन पेक्षा जास्त हयात अपत्ये नसावेत. 4)लाभार्थी मध्ये 33% महिला लाभार्थी असावेत . शेळी गट वाटप /अर्थिक सहाय्य-    या योजनेनुसार लाभार्थीस एक शेळी गट ज्यामध्ये 10 शेळी व एक बोकड असा शेळीचा गट मिळतो .यामध्ये 75%अनुदान तर 25%वित्तीय /बँकिंग संस्थाचे कर्ज स्वरुपात लाभ मिळतो .प्रति बोकड 7000 /- व शेळी प्रति शेळी 6000/- याप्रमाणे 10 शेळीचे 60000 व बोकडचे 7000 असे ऐकून 67000 /- प्रति लाभार्थीला मिळेल यामधून शेळीचा विमा 2.25...

"माझी कन्या भाग्यश्री योजना " च्या नवीन नियम व शर्ते वाचा सविस्तर.

 "माझी कन्या भाग्यश्री योजना " च्या नवीन नियम व शर्ते वाचा सविस्तर.  " माझी कन्या भाग्यश्री " ही योजना महाराष्ट्र सरकारच्या विकास विभागामार्फत राबविण्यात येते .या योजनेचा मुख्य उद्देश म्हणजे महिला सबलीकरण असून समाजामध्ये स्त्री -पुरुष लिंग गुणोत्तर समान करणे .ही योजना नवीन अटी व शर्ते नुसार लागू करण्यात आली आहे .ही योजना मुलीच्या जन्मानंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या माता पित्यास आर्थिक स्वरूपात सहाय्य केले जाते. 1 ऑगस्ट 2017 नंतर जन्माला येणाऱ्या मुली या योजनेचा लाभ घेण्यास पात्र ठरतील . पहिल्या मुलीच्या जन्मानंतर माता पित्याने कुटूंबनियोजन साठी शस्त्रक्रिया केली असल्यास ₹50000/- माता पित्यास आर्थिक सहाय्य केले जाते. पहिली मुलीच्या जन्मानंतर दुसरीही मुलगी जन्माला आली असेल आणि त्यानंतर माता पित्याने कुटूंबनियोजन साठी शस्त्रक्रिया केली असल्यास ₹25000/- माता पित्यास आर्थिक सहाय्य केले जाते. पहिली मुलगी जन्माला आली असेल व त्यानंतर दुसऱ्यांदा जुळ्या मुली जन्माला आली असतील तर असे माता पिता या योजनेसाठी पात्र असतील . पहिल्या मुलीच्या जन्मानंतर 2 वर्षाच्या आत कुटूंबनियोजन शस्त्र...

नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना अंतर्गत ₹ 6000/-अनुदान.

 नरेंद्र मोदी यांची शेतकऱ्यांसाठी कृषी सन्मान योजना अंतर्गत ₹6000/-अनुदान.   नरेंद्र मोदी शेतकरी साठी एक योजना चालू केली असून या योजनेचे गरीब /अल्पभूधारक शेतकरी याचा लाभ घेत आहेत .अजून बरेच  काही गरीब शेतकरी /अल्पभूधारक शेतकरी याचा लाभ घेण्यापासून वंचित आहेत. या योजनेची सविस्तर माहिती खालील तपशीलप्रमाणे आहे. या योजनेची प्रमुख अटी व शर्ते - 1) लाभार्थी हा भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीच्या नावावर 2 हेक्टर किंवा त्यापेक्षा कमी शेत जमीन नावावर असणे आवश्यक आहे. ही या योजनेची प्रमुख अट आहे. 3)लाभार्थी हा शासकीय कर्मचारी असू नये. लागणारे आवश्यक कागतपत्रे - 1)आधारकार्ड /मतदानकार्ड 2)जमीन सातबारा /अल्पभूधारक प्रमाणपत्र 3)बँक पासबुक  अधिक माहितीसाठी संपर्क - आपल्या महसूल तलाठीशी संपर्क साधून अधिक माहिती मिळवू शकता व तेथेच या योजनेचा अर्ज उपलब्ध होईल.

किरकोळ प्रोफेशनल व्यवसाय करून कमवा लाखो रुपये .

 किरकोळ प्रोफेशनल व्यवसाय करून कमवा लाखो रुपये .      किरकोळ प्रोफेशनल व्यवसाय म्हणजे कामात सुसूत्रता असणे होय .जे काम आपण चांगल्या पद्धतीने करून कमी हार्ड /शारीरिक काम पण बौद्धिक काम करून चांगला प्रोफेशनल व्यवसाय करू शकता .     ग्रामीण व शहरी भागातही व्यवसाय करू शकता .यामध्ये प्रोफेशनल रित्या  कोणते व्यवसाय करता येतील ते खालीलप्रमाणे स्पष्ट करता येतील. 1) मोबाईल दुरुस्ती व अवलंबून कामे -      मोबाईल दुरुस्ती करणे हा एक प्रोफेशनल व्यवसाय असून हा व्यवसाय निरंतर चालणारा व्यवसाय  आहे.या व्यवसायामध्ये चांगली कमाई करू शकतो .यामध्ये ITI मध्ये मोबाईल रेपेरिंग करण्याचा कोर्स असतो .हा कोर्स केल्यानंतर चांगल्या पध्दतीने हा व्यवसाय करू शकतो. 2)बेकरी व्यवसाय -     हा एक चांगला व्यवसाय आहे .यामध्ये 50 % मार्जिन भेटते .यामध्ये काही विशिष्ट लोकांचा समुदायच हा व्यवसाय करतात .यामध्ये महाराष्ट्रीयन लोक कमी आहेत .त्यामुळे आपणही हा व्यवसाय करू शकतो .बेकरी पध्दत सहज सोपी असते एकदा शिकून घेतल्यानंतर सहज समजून जातो व चांगला नफा कमावू शकतो. 3)हेअ...

असंघटित कर्मचारी /कामगार /शेतकरी साठी अत्यल्प प्रीमियम वरील अटल पेन्शन योजना.

 असंघटित कर्मचारी /कामगार /शेतकरी साठी अत्यल्प प्रीमियम वरील अटल पेन्शन योजना. योजनेचे नाव - अटल पेन्शन योजना . ही योजना केंद्र सरकारमार्फत राबविण्यात येते . प्रमुख अटी व शर्ते - 1) लाभार्थी हा भारताचा मूळ रहिवासी असणे आवश्यक आहे. 2)वयाचे कमीत कमी 18 व जास्तीत जास्त 40 वर्ष असणे आवश्यक आहे. 3)लाभार्थी हा असंघटित कर्मचारी ,खाजगी कर्मचारी, शेतकरी, रोजगार करणारे मजूर या योजनेसाठी पात्र ठरतील . या योजनेचे फायदे -  1)अत्यल्प प्रीमियम ची सुविधा . 2)यामध्ये केंद्र सरकार 50 % रक्कम लगेच प्रिमियम मध्ये जमा करते . 3)प्रीमियम महिन्याला ,तिमाही ,अर्धवर्षी प्रीमियम भरता येतो. 4)वयाच्या 60 व्या वर्षीपासून लगेच पेन्शन चालू होईल . 5)ज्यांना एकदाच भरलेली रक्कम हवी असेल त्यांना व्याजासकट केंद्र सरकारतर्फे जमा झालेली 50 %रक्कम वयाच्या 60 व्या वर्षी मिळेल. आवश्यक कागतपत्रे - 1)आधारकार्ड /मतदानकार्ड 2)रहिवासी पुरावा 3)कोणत्याही राष्ट्रीयीकृत बँकेत खाते असणे आवश्यक आहे. या योजनेचे प्रिमियम केवळ 126 ते 864 रुपयांपर्यंत आहे .वयाच्या 60 व्या वर्षी किमान आपल्या प्रिमियम नुसार 1000 ते 5000 रुपये मासिक प...

डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .

 डॉ. बाळासाहेब सावंत  कोकण कृषी विद्यापीठ दापोली रत्नागिरी मध्ये  विविध पदांसाठी भरती प्रक्रिया .      डॉ .बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठ दापोली मध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले असून शैक्षणिक पात्रता धारक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.सदर भरती प्रक्रिया ही कंत्राटी पध्दतीने मानधन तत्वावर पद भरती करण्यात येणार आहे.पदांचा तपशिल खालीलप्रमाणे आहे. 1) कृषी सहाय्यक - पदांचे संख्या = 02    शैक्षणिक पात्रता = कृषी पदविका मध्ये उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेतन /मानधन =12000/-प्रतिमहा. 2) कार्यालयीन सहाय्यक- पदांचे संख्या = 01    शैक्षणिक पात्रता = कोणत्याही शाखेतील पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.MSCIT ,मराठी 30 व इंग्रजी 30 & 40 परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वेतन /मानधन =12000/-प्रतिमहा. 3) जीप वाहनचालक - पदांचे संख्या = 01    शैक्षणिक पात्रता = 10 वि उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.वाहनचालक परवाना असणे आवश्यक आहे. वेतन /मानधन =12000/-प्रतिमहा. 4) ट्रॅक्टर वाहनचालक - पदांचे संख्या = 01    शैक्षणिक ...

लॉकडाउन मध्ये घरीच राहून कमावण्याच्या संधी .

  लॉकडाउन मध्ये घरीच राहून कमावण्याच्या संधी स्रोत .      महाराष्ट्र राज्यात सध्या कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहेत.त्यामुळे महाराष्ट्र सरकारने अनेक निर्बंध लावले आहेत. त्यामुळे अनेकजनाना जॉब वरून कमी करण्यात आलेले आहेत. त्यामुळे घरीच राहून कमाई करण्याचे संधी शोधली पाहिजे .व ही संधी कायमस्वरूपी कमाई करून देणारी आहेत त्या संधी स्रोत खालीलप्रमाणे सांगता येतील. 1)आपला स्वतःचा व्यवसाय असल्यास ,त्याची ऑनलाइन पद्धतीने विक्री करणे .         अमेझॉन ,फ्लिपकार्ट ,खाद्य पदार्थांसाठी झोमॅटो सारखे ऑनलाइन apps आहेत .या apps च्या माध्यमातून आपण आपल्या वस्तू /पदार्थ ऑनलाइन पद्धतीने विक्री करू शकतो. व या माध्यमातून चांगली कमाई करू शकतो ,ज्यांचा अगोदर व्यवसाय होता असे व नव्यानेही सुरू करु शकतात. 2)ऑनलाइन माध्यम - युट्युब          ऑनलाइन माध्यम युट्युब सध्या खूप लोकप्रिय झालेला आहे. या माध्यमातून अनेक जण ऑनलाइन पैसे कमावतात .यामध्ये आपला युट्युब चॅनेल तयार करून आपल्या कडील असणाऱ्या कला ,कौशल्य यांच्यावर आधारित विडिओ तयार करून युट्युब वर अपलोड...

महिला बचत गट योजना व फायदे.

              महिला बचत गट योजना व फायदे.             महिला बचत गटास स्वयंसहाय्यता असेही म्हणतात .यामध्ये केवळ महिला सदस्य एकत्र येतात व गट स्थापन करतात .याचा मुख्य उद्देश म्हणजे एकमेकांना आर्थिक सहाय्यपूर्ण करणे हा असतो. यामध्ये 20 व त्यापेक्षा कमी महिला एकत्र येतात व काही विशिष्ट रक्कम जमा महिन्यातून एकदा किंवा आढवड्यातून एकदा जमा करतात .व जमा झालेली रक्कम ही गटामधीलच सदस्यांनी विशिष्ट व्याजदराने कर्जाने रक्कम दिली जाते. महिला बचत गटाचे वैशिष्ट्ये - 1) यामध्ये केवळ महिला सदस्याचे गट असते. 2)18 वयोवर्ष पूर्ण झालेल्या कोणतीही महिला सदस्य या गटाचे सदस्य होऊ शकतात. 3)महिला बचत गटाचा मुख्य उद्देश हा आर्थिक सहाय्य करणे हा असतो. 4)महिन्यातुन किंवा आढवड्यातून एकदा बचत गटातील सदस्य एकत्र जमा होऊन विशिष्ट रक्कम जमा करतात. 5)जमा झालेली रक्कम ज्या सदस्याला आवश्यक आहे ,त्यांना विशिष्ट व्याजदराने दिली जाते. बचत गटाचे शासकीय व वित्तीय फायदे - 1) विविध बँकेमार्फत महिला बचत गटांना अत्यल्प व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देतात. 2)शासनाच्या वि...

महाराष्ट्र राज्य सरकारची केवळ 2% व्याजदराने,25% बीजभांडवल व 25000/-थेट कर्ज योजनाच्या नवे अटी शर्ती नियम.

 महाराष्ट्र राज्य सरकारची केवळ 2% व्याजदराने, 25% बीजभांडवल व 25000/-थेट कर्ज योजनाच्या नवे अटी शर्ती नियम.   महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे व्यवसाय करणाऱ्या नवउद्योजकांना आर्थिक सहाय्य करण्यासाठी ही योजना आहे. ही एक कर्ज योजना असून या योजनेच्या कर्जाचे व्याजदर अत्यल्प आहे. व परतफेडीची मदतही जास्त आहे. योजनेचे नाव- राज्य सरकार 25%बीजभांडवल किंवा 25000/-थेट कर्ज योजना . योजना ज्या प्रवर्गासाठी लागू आहे त्या प्रवर्गाचे नाव -  1)विमुक्त जाती (व्ही. जे) 2)भटक्या जमाती (भ. ज) 3)विशेष मागास प्रवर्ग (ओ. बी.सी) योजनेसाठी प्रमुख अटी व शर्ते- 1) लाभार्थी हा महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असणे किंवा 20 वर्षे कायम महाराष्ट्र राज्यात रहिवास असणे आवश्यक आहे. 2)लाभार्थीच्या वय किमान 18 व कमाल वय 45 असणे आवश्यक आहे. 3)लाभार्थी हा वरील नमूद केलेल्या प्रवर्गातिल असणे आवश्यक आहे. 5)इतर कोणत्याही प्रकारचे कर्ज बाकी असू नये. 6)व लाभ घेणाऱ्याचे वार्षिक उत्त्पन्न -1 लाख पर्यंत असावे. लाभाचे आर्थिक स्वरूप -  25% बीजभांडवल साठी व्यावसायाची प्रकल्प मर्यादा 5 लाखासाठी 4% व्याजदराने 5 वर्ष परतफे...

सुशिक्षित बेरोजगार साठी उदयोग करण्यासाठी मुद्रा कर्ज योजना .

 सुशिक्षित बेरोजगार साठी उदयोग करण्यासाठी मुद्रा कर्ज योजना .   मा. नरेंद्र मोदी यांनी दि.8 एप्रिल 2015 रोजी बेरोजगार सुशिक्षित युवकांसाठी उद्योग उभारण्यासाठी या कर्ज योजनेची सुरुवात केली.या कर्ज योजनेची तीन गटात वर्गीकरण करण्यात आले आहेत.   1)शिशु गट - 10000/-ते 50000/-   2)किशोर गट -50000/- ते 5 लक्ष  3)तरुण गट - 5 लक्ष ते 10 लक्ष        ही योजना सुशिक्षित बेरोजगार तरुण यासाठी असून किरकोळ भाजीपाला विक्रेता, गवंडी ,लहान उद्योग ,सुतार उद्योग ,बेकरी विक्रेता ,शिंपी हे उद्योग शिशु गटात मोडतात .ह्या योजनेचा लाभ घेणारे तरुण गरीब होतकरु मागासवर्गीय असणे किंवा आर्थिक दृष्टीने मागास असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसायाच्या स्वरूपानुसार कर्जाची रक्कम मिळेल. वरी नमूद केल्याप्रमाणे कर्जाची रक्कम मिळेल. ह्या योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रथम आपण आपल्या जवळच्या राष्ट्रीयीकृत बँकेला भेट देणे गरजेचे आहे .त्याठिकाणी आपल्याला मुद्रा लोन योजनेचा अर्ज प्राप्त होईल. त्याठिकाणी योजनेची सर्व माहिती प्राप्त होईल . प्रमुख अटी व शर्ते - 1)लाभार्थी हे महाराष्ट्र राज्याचा रहिवा...

राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस भरती बाबत सकारात्मक वक्तव्य.

  राज्याचे नवे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील पोलीस भरती बाबत सकारात्मक वक्तव्य.     नुकतेच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख त्यांच्यावर लागलेल्या आरोपामुळे यांनी आपल्या गृहमंत्री पदाचा राजीनामा दिल्याने आज मा. ना.दिलीप वळसे पाटील यांनी गृहमंत्री पदांचा पदभार स्वीकारला .पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना त्यांनी पोलीस भरती बाबत सकारात्मक वक्तव्य केले असून अनेक बाबी त्यांनी स्पष्ट केल्या आहेत. 1)प्रशासनामध्ये हस्तक्षेप करणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. 2)महत्त्वाचे म्हणजे पोलीस सक्षम करण्यावर भर देणार असे त्यांनी स्पष्ट केले . 3)पोलीस प्रशासनामध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागेमुळे पोलीस प्रशासनावर मोठा ताण निर्माण होत आहे .त्यासाठी लवकरच पोलीस भरती करण्याचे आश्वासन दिले आहे. 4)पोलीस वसाहत साठी भरीव काम करणार असे स्पष्ट केले आहे. 5)मा. ना.दिलीप वळसे पाटील हे पोलीस भरती बाबत सकारत्मक धोरण ठरवतील.

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा ,आवश्यक पात्रता आताच करून घ्या पूर्ण.

 महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा ,आवश्यक पात्रता आताच करून घ्या पूर्ण.       महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ मध्ये मोठ्या प्रमाणात रिक्त जागा आहेत. या रिक्त जागेसाठी लवकरच भर्ती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.पदासाठी आवश्यक असणारी पात्रता अनेक उमेदवाराचे पूर्ण नसल्याने भारती प्रक्रिया मध्ये भाग घेता येत नाहीत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातिल विविध पद व त्या पदासाठी आवश्यक पात्रता .  1) वाहक -(कंडक्टर)     शैक्षणिक पात्रता -      पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.     जड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.     वाहक /बॅच बिल्ला असणे आवश्यक आहे.    वयोमर्यादा -25 वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे. 2) वाहनचालक -      शैक्षणिक पात्रता-     12 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.     जड वाहन चालक परवाना असणे आवश्यक आहे.    वयोमर्यादा - वयाचे 25 वर्ष पूर्ण असणे आवश्यक       आहे. 3)लिपिक टंकलेखक -    शैक्षणिक पात्रता - ...

राज्य शासनाची वाहनचालक मोफत प्रशिक्षण योजना अटी व शर्ते.

 राज्य शासनाची वाहनचालक मोफत प्रशिक्षण योजना अटी व शर्ते.     महाराष्ट्र शासनातर्फे वाहनचालक प्रशिक्षण योजना राबविण्यात येते यासाठी खाजगी प्रशिक्षण संस्था कडून वाहनचालक प्रशिक्षण घेणाऱ्याना प्रशिक्षण अनुदान दिले जाते. पात्र लाभार्थी - लाभार्थी विशेष मागासवर्गीय ,विमुक्त जाती/जमाती,इतर मागास प्रवर्ग ,अनुसूचित जाती या प्रवर्गातील असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता -10 वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. प्रशिक्षण अनुदान दर हे प्रशिक्षण वाहन प्रकारानुसार दिले जाते. हलके वाहन प्रशिक्षण= 4264/- जड वाहन प्रशिक्षण   = 4960 /- वाहक                      =1728/-   जर लाभार्थी प्रशिक्षण काळात वसतिगृह राहत नसल्यास प्रति महा 300 रुपये विद्यावेतन दिले जाते.व वाहक प्रशिक्षण करणाऱ्यास 150 रुपये विद्यावेतन दिले जाते. लागणारे कागदपत्रे   1)आधारकार्ड /मतदान कार्ड. 2)महाराष्ट्र राज्याचा रहिवासी प्रमाणपत्र. 3)10 वी उत्तीर्ण प्रमाणपत्र. 4)शासनमान्य वाहन प्रशिक्षण संस्था प्रवेश पावती. 5)योजना पात्र असणाऱ्या जातीचा दाखला. अर्ज कर...